श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद मोहिमेला उदंड प्रतिसाद
By : Polticalface Team ,10-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी १० सप्टेंबर रोजी जनसंवाद मोहीम आयोजित करण्यात आली या काँग्रेस पक्षाच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने 10 सप्टेंबर रोजी येळपणे, बेलवंडी, काष्टी, गट व त्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समिती गणामध्ये काँग्रेस पक्षाचा जनसंवाद साधण्यात आला. या मोहिमेला उत्साही वातावरणात उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वाजता देवदैठण, राजापूर, ऊकडगाव, बेलवंडी बुद्रुक, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, अजनुज आणि लिंपणगाव येथे सायंकाळी सहा वाजता या गट व गणामध्ये समारोप झाला.
यावेळी लिंपणगाव येथे आयोजाित जनसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उदयसिंह जंगले हे होते.
या जनसंवाद कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक धर्मनाथ काकडे, नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले, अॅड अशोकराव रोडे, महेश तावरे, चेअरमन रवींद्र खळतकर, दादासाहेब कुरुमकर, महेश जंगले, प्रा रघुराज कुरुमकर, लक्ष्मण भोईटे, रावसाहेब रेवगे, संपत होले, मेजर प्रकाश चव्हाण, चंद्रकांत कुरुमकर, बापूराव रेवगे, डॉ दत्तात्रेय गायकवाड, रवींद्र भोंडवे, ईश्वर रेवगे विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक नागवडे कारखान्याचे माजी संचालक अशोकराव रोडे यांनी केली यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसने सत्तेवर असताना लोकशाही व हुकूमशाहीचा कदापिही निर्णय घेतला नाही. देशात काँग्रेस पक्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी क्रांतिकारक निर्णय काँग्रेसने घेतले. भाजपने मात्र महागाई वाढवून शेतीमालाचे भाव रोखले. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांची कंबरडे मोडण्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष महेश तावरे यांनी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी काँग्रेसवर निष्ठा ठेवत आपले सर्वस्व पणाला लावले तालुक्यात काँग्रेस पक्ष नागवडे कुटुंबांनी वाढवला म्हणून 2024 ला नागवडे कुटुंबातील सौ अनुराधाताई नागवडे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी आम्ही तन-मन-धनाने सौ. नागवडे यांना विधानसभेत पाठवल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यावेळी म्हणाले की, भाजप सरकारने जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवले. पेट्रोल- डिझेलचे भाव वाढवून शेतकऱ्यांना देसोधडीला लावले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भाजप विषयी अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या सत्ता कालावधीत मात्र काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार दिला. याउलट भाजप सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात फक्त आश्वासने देऊन आपकी बार मोदी सरकार या जाहिरातीतून फक्त सत्ता मिळवण्याचे काम केल्याचे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुका समन्वयक ज्ञानदेवराव वाखारे यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा देशात सर्वसामान्यांच्या विचाराचा पक्ष आहे. देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांचे जीवन सुखी व्हावे ही धोरणे काँग्रेस पक्षाची होती. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या हितासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. सर्वच क्षेत्रात नेहरूजींनी दिशा दिली. त्यानुसार देशाने वाटचाल सुरू केली. काँग्रेसच्या काळात धरणे बांधली, काँग्रेसच्या थोर नेत्यांनी सर्वसामान्यांसाठी हितासाठी आपले सर्वस्व पणाला लावले बलिदान दिले. असे सांगून ते पुढे म्हणाले की, देशात 66 कोटी लोक शेतीवर अवलंबून आहेत. असंख्य धरणे बांधली, भाजपच्या काळात फक्त एकच धरण बांधले. भाजपकडे सत्ता देऊन देश अधोगती कडे गेल्याचे सांगून श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचारधारा डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी या दुष्काळी तालुक्याला वैभव मिळून दिले. सहकार, सिंचन, शिक्षण क्षेत्रात बापूंनी मोठे योगदान दिले. म्हणूनच हा तालुका आज वैभवशाली दिसतो. त्यामुळे आपण सर्वांनी यापुढे देशात काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेवर येण्यासाठी क्रियाशील राहून काँग्रेसचे संघटन वाढवावे असे आवाहन यावेळी श्री वाफारे यांनी केले.
सूत्रसंचालन रवींद्र भोंडवे सर यांनी केले आभार नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी