पावसासाठी लिंपणगावकरांचे सिद्धेश्वर व लिंगाळेश्वराला साकडे!
By : Polticalface Team ,14-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज व श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर महाराज या ग्रामदेवतेला लिंपणगावकरांनी भरपूर पाऊस पडून धनधान्य मुबलक मिळू द्या, त्यातून पिण्याच्या पाण्याची वाणवा दूर होऊ द्या अशा अंतकरणपूर्वक प्रार्थना लिंपणगावच्या ग्रामस्थांनी या दोन्हीही जागृत देवस्थानला केल्या. दरम्यान पावसाने चार महिन्यापासून पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पीक पेरणीचे व जलसंकट उभे राहिले आहे. खरिपाचा हंगाम यशस्वी होत असताना पावसाने मात्र ओढ दिली. त्यामुळे तालुक्यात भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांना आनंदित ठेवा, अशा प्रार्थना लिंपणगावच्या भाविक भक्तांनी या ग्रामदैवतेला केले आहेत. दरम्यान पाऊस पडला नाही तर लिंपणगाव या ऐतिहासिक गावची पार्श्वभूमी अशी की ग्रामस्थ सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती पालखीमध्ये ठेवून वाजत गाजत श्रीगोंदा फॅक्टरी येथील जागृत देवस्थान श्री लिंगाळेश्वर महाराजांच्या मंदिरात पालखीचे प्रस्थान केले जाते. ही परंपरा लिंपणगावचे दिवंगत ज्येष्ठ ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांच्या संकल्पनेतून गावात पावसाअभावी जलसंकट निर्माण सिद्धेश्वर महाराजांना वाजत गाजत श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर महाराजांच्या भेटीसाठी सिद्धेश्वर महाराजांची पालखी काढून हर हर महादेव म्हणत वाजत गाजत काढण्याची प्रथा आहे. तीच प्रथा बुधवारी 13 सप्टेंबर रोजी लिंपणगावच्या सिद्धेश्वर मंदिरातून तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तेथे पालखीचे लिंगेश्वर मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर लिंगाळेश्वर मंदिरात लिंगेश्वर महाराजांना धार्मिक पद्धतीने महाआरती करून पुन्हा हर हर महादेव म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान करून सिद्धेश्वर मंदिरात पुनरागम केले जाते. याप्रसंगी लिंपणगावच्या ग्रामस्थांनी भरपूर पावसासाठी या दोन्हीही जागृत देवस्थानला नतमस्तक होत साकडे घातले आहेत. सद्यस्थितीला दररोज ढगाळ वातावरण तयार होऊन पुन्हा उन्हाची वाढले जाते आहे .वारे देखील सुसाट वाहताना दिसत आहेत. त्यामध्ये आता रब्बी हंगामाचा मोसम सुरू होता असताना पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी गाव परिसरातील गावतळी बंधारे पाण्याअभावी कोरडी असून विहिरींनी देखील तळ घाठला आहे . त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांना देखील आता पाणी मिळणे मुश्किल बनले आहे त्यामुळे आता आमच्यावर कृपावृष्टी असावी तुम्हीच आमचे तारणहार आहात मुबलक पाऊस पडू द्या, अशा प्रार्थना देखील उपस्थित भजनी मंडळ ग्रामस्थ व भाविकांनी श्रद्धापूर्वक व्यक्त केले आहे. या पालखी सोहळ्या दरम्यान गावचे ज्येष्ठविधी तज्ञ सुधीर कुलकर्णी पुजारी शिवप्रसाद गुरव यांच्यासह गावातील काही ज्येष्ठ मंडळी यांनी यावेळी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :