सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचे कार्य दीपस्तंभासारखे - ह भ प अविनाश महाराज साळुंखे

By : Polticalface Team ,19-09-2023

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचे कार्य दीपस्तंभासारखे - ह भ प अविनाश महाराज साळुंखे लिंपणगाव (प्रतिनिधी: नंदकुमार कुरूमकर )- श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे बापू यांचे कार्य दीपस्तंभ सारखे होते. ते सत्वशील व तत्वनिष्ठ नेते होते. बापूंनी श्रीगोंदा तालुका अंधारातून प्रकाशाकडे मोठ्या कष्टातून घेऊन जात असताना तालुक्याचे भौगोलिक दृष्ट्या नंदनवन करत तालुका वैभवशाली केला. असे गौरवदगार ह भ प अविनाश महाराज साळुंखे यांनी आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात व्यक्त केले.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांचे पाचवे पुण्यस्मरण कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बापूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी अंतकरणपूर्वक अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे होते.

यावेळी व्यासपीठावर नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे, ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते, माजी सभापती सखाराम जगताप, जिजाराम खामकर, माणिकराव खराटे बाळासाहेब पठारे सुभाष वाघमारे सतीश मखरे, बाळासाहेब लोखंडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सहकार महर्षी बापूंच्या कार्याला उजाळा देताना ह भ प साळुंखे महाराज पुढे म्हणाले की, सप्तसुरांचे इंद्रधनुष्य सहकार महर्षी बापूंनी आपल्या सवकर्तुत्वावर इतिहासाच्या पानावर झळकावले. सर्वसामान्यांच्या हितासाठी सहकार महर्षी बापू हे अजरामर ठरले आहेत. असे सांगून साळुंखे महाराज आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी दिलेली प्रत्येक प्रेरणा व त्यांचे जीवन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करावी. हीच खरी बापूंना आदरांजली ठरेल असे सांगून साळुंखे महाराज पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये समाज हित डोळ्यासमोर ठेवत असताना सभासद व सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानला. त्यातून सर्वच घटकांची भरीव अशी प्रगती झालेली दिसते. साळुंखे महाराज आणखी पुढे म्हणाले की, बापू हे आकाशाला गवसीणी घालणारी व्यक्ती होती. सहकार हा परिवारा आहे, तो व्यवस्थित चालला पाहिजे. त्यासाठी बापूंनी अहोरात्र कष्ट घेतले. जुनी जाणती माणसे जेव्हा जातात, खऱ्या अर्थाने तेव्हा इतिहासाच्या पानावर आपले कर्तृत्व ठेवून जातात. सहकार महर्षी बापूंनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये विश्वाला घर मानले. त्याप्रमाणे तालुक्याला देखील घर मानले. जीवनामध्ये आचार -विचाराची सांगड घातली. समाज हित डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस सर्वसामान्य माणसाच्या हिताचा ध्यास घेतला म्हणून सहकार महर्षी बापू हे सर्वांचेच प्रेरणास्थानी आहेत. असे सांगून साळुंखे महाराज यांनी भाषण शैलीतून बापूंच्या सत्कार्याला विनम्र असे अभिवादन केले.

नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी अभिवादन करताना म्हणाले की, नगर जिल्हा सहकारामध्ये जो पुढे गेला. त्यामध्ये प्रामुख्याने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, मारुतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, दादा पाटील शेळके, यांच्याबरोबरने शिवाजीराव नागवडे बापू यांनी नेत्र दीपक काम करत इतिहासाच्या पानावरती या थोर नेत्यांची नोंद झालेली आहे .असे सांगून पुढे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यात घोड -कुकडीच्या पाण्यासाठी मोठे योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने कुकडीचे पाणी विसापूर मध्ये देखील मोठ्या संघर्षातून मिळविले. या तालुक्याच्या जडणघडणीत बापूंनी सहकार, शिक्षण व सिंचन क्षेत्रा सह कर्मवीर अण्णांच्या बरोबरीने शिक्षण क्षेत्रात देखील भरीव योगदान दिल्याचे श्री भोस यावेळी सांगितले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बापूंना अभिवादन करताना म्हणाले की, सहकार महर्षी बापू जाऊन आज पाच वर्षे झालेले असताना त्यांची आठवण प्रत्येक घटकाला क्षणाक्षणाला जाणवते. सहकार महर्षी बापूंनी कुटुंबापेक्षा समाज सेवेला अधिक महत्त्व दिले. श्रीगोंदा तालुक्याला वीज रस्ते, पाणी मिळाले पाहिजे यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. सेवा संस्था ग्रामपंचायत पदाधिकारी यांना बरोबर घेऊन तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नात जातीने लक्ष घातले. दुष्काळी तालुका सहकाराच्या माध्यमातून बापूंनी मोठ्या संघर्षातून प्रगतीपथावर आणला. त्यामध्ये नागवडे कारखान्याच्या स्थापनेपासून कारभार पाहत असताना सहकारी मित्रांना विश्वासात घेऊन साखर कारखाना काटकसरीने चालवला. त्यामुळे या कारखान्याचा कारभार राज्यात नेत्र दीपक ठरला गेला आहे. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, ज्यावेळेस नागवडे कारखान्याचा कारभार पाहत असताना काही मंडळींनी संचालक मंडळावर अविश्वास ठराव आणला त्यावेळी मात्र बापूंनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत सहकाराचा कायदा देखील एका रात्रीतून बदलला गेला. त्यामुळे राज्यात देखील ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित राहिले. सत्ता संपत्ती पेक्षा समाजसेवेचा ध्यास बापूंनी अधिक घेतला. भोसा खिंडीतील अपूर्ण 13 किलोमीटर बोगद्याचे काम देखील शासन दरबारी पाठपुरावा करून काम मार्गी लावले. जीवन जगत असताना आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वसामान्यांसाठी सहकार महर्षी बापूंनी खर्ची घातला. त्यामुळे त्यांचे जीवन निश्चितच सार्थक झाले असल्याचे सांगत श्री राजेंद्र दादा नागवडे यांनी सहकार महर्षी बापूंना भावनिक दृष्ट्या अभिवादन केले.

याप्रसंगी या पुण्यस्मरण सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, नागवडे कारखान्याचे आजी माजी संचालक, सर्व खाते प्रमुख, कामगार, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान आदी संस्थांचे निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नागवडे कारखान्याचे जेष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पवार यांनी केले आभार कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी