शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला शेतकरी बाल बाल बचावले
By : Polticalface Team ,19-09-2023
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अहमदनगर टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या मांगी वडगाव पुनवर या परिसरात गेली कित्येक महिन्यापासून बिबट्याने हैदोस घातला आहे या बिबट्याने आज सकाळी दहा वाजता उत्तर वडगाव येथील शेतकरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे त्यातून ते सही सलामत सुटले आहे
याबाबतची माहिती अशी की उत्तर वडगाव येथील शेतकरी राजेंद्र नरसाळे हे नेहमीच्या पद्धतीने आपल्या उसाच्या शेताकडे गेले होते ते शेतात आपले काम उरकून त्यातून बाहेर आले असता अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात बिबट्याने त्यांचे पाय धरले असता त्यांनी त्यांच्याकडील असणाऱ्या कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला या कोयत्याच्या हल्ल्यामुळे बिबट्या त्या शेतकऱ्याला सोडून पळाला दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यातून बाल बाल बचावले सदरचा प्रकार हा आज सकाळी दहा वाजता त्यांच्या उसाच्या शेताच्या बाहेर घडला आहे त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या कळताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना करमाळा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे त्यांची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरने सांगितले आहे
सदरचा बिबट्या हा गेली दोन ते तीन महिन्यापासून पुनवर, वडगाव उत्तर व दक्षिण, मांगी परिसरात राजरोसपणे फिरत आहे यासाठी वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले आहे मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही बिबट्याने मात्र आता आपला मोर्चा मानवी वर्गाकडे वळविला आहे सदर बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी मांगी व वडगाव परिसरातील शेतकरी मधून होत आहे सदर परिसराची पाहणी करण्याकरिता मोहोळ सोलापूर येथील वरिष्ठ वनपाल अधिकारी वडगाव येथे दाखल झाले आहेत
वाचक क्रमांक :