श्रीगोंदा तालुक्यात गौरी गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वत्र संततधार पाऊस,
शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची सरासरी 52.5 नोंद
By : Polticalface Team ,23-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह पावसाने प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या तीन साडेतीन महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली शेतकऱ्यांनी मात्र कमी ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या. त्याची उगवण देखील चांगली झाली. परंतु पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाचे पिके धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली असताना अचानक पावसाने खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यातच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार उशिरा का? होईना परंतु गौरी गणरायाचे आगमन आणि पावसाला सुरुवात हा आमच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसत होत्या. दरम्यान पावसाळा सुरू होऊन जवळपास तीेन-साडेतीन महिने उलटले. परंतु उन्हाची तीव्रता वाढवून त्यामध्ये उकाड्याचे प्रमाण अधिक वाढल्याने त्याचा परिणाम पिकांबरोबर मानवी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत होता. सर्वत्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असतानाच जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही असे चित्र चालू वर्षी निर्माण होते.शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्मांण झाले. श्रीगोंदा तालुका हा संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका समजला जातो. त्यामध्ये या महान संत महापुरुषांवर देखील येथील जनतेची अपार श्रद्धा आहे. संकट कालीन परिस्थितीत निश्चितपणे भगवांत धावून येईल अपेक्षा देखील शेतकऱ्यांना दृढ होती. ती तंतोतंत खरी ठरली. दरम्यान गावोगावी पवित्र महिना समजला जाणारा श्रावण शुद्ध या महिन्यांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळे भरपूर पावसासाठी यज्ञ आयोजित केले जातात. त्यामुळे हा तालुका निश्चितपणे धार्मिक क्षेत्रात अग्रेसर समजला जातो. असो, गौरी गणरायांचे आगमन झाल्यानंतर तालुक्यात सर्वत्र अचानक पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दाटून आले.
एकीकडे पावसाने पाठ फिरवली. दुसरीकडे मात्र पाऊस पाणी नसल्याने ओढे, नाले, बंधारे, गावतळी पाण्याअभावी कोरडे पडले. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनला. 1972 च्या दुष्काळाची सर्वांनाच जाणीव होताना दिसून आली. विशेष म्हणजे श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड, भीमा नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची घट झाली. त्यामुळे चालू वर्षी दुष्काळाचे सावट पडणार अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच पावसाने मात्र अचानक संतधार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसतोय. कारण गेल्या वर्षी अतिवृष्टीने मोठे थैमान घातले. हातात तोंडाशी आलेली खरीपाची पिके काही क्षणात गेली. त्यावेळी मात्र शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. राज्य सरकारने गेल्या वर्षी खरीप हंगामाच्या नुकसानीचे पंचनामे केले. यातून काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. परंतु अनेक अल्पभूधारक शेतकरी या अनुदानापासून अद्यापही वंचित आहेत. दररोज शासन दरबारी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. अशी स्थिती असताना आता पुढे रब्बी हंगामाचा मौसम सुरू होणार आहे. पावसाने अशीच साथ दिली, तरच रब्बी हंगाम यशस्वी होऊ शकतो. अन्यथा रब्बी हंगामाचे भवितव्य अंधकारमय असणार आहे. असे शेतकरी सांगतात.
दरम्यान गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीगोंदा तालुक्यात पावसाची सरासरी 52.5 इतकी नोंद झाली आहे. त्यामध्ये तालुक्यात आठ कृषी मंडल असून, सरासरी मंडल प्रमाणे पावसाची नोंद पुढीलप्रमाणे श्रीगोंदा 36.3, काष्टी 32.8, मांडवगण 46.5, बेलवंडी 71.8, पेडगाव 15.5, चिंभळा 36.00, देवदैठण ३४. ००, कोळगाव 114.8 इतक्या पावसाची सरासरी नोंद झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्यात बेलवंडी आणि कोळगाव मंडल कार्यक्षेत्र वगळता अन्यमंडल क्षेत्रात पावसाची अत्यल्प पर्जन्यमान दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित मंडळामध्ये अद्यापही मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा असून, वातावरण अद्यापही ढगाळ असून, उकाड्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. एकूणच 21 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने मात्र उभ्या खरीप हंगामांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी