गोर गरिबांची होणारी लुटमार रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर बंद करणार - खा.डॉ.सुजय विखे पाटील

By : Polticalface Team ,07-10-2023

गोर गरिबांची होणारी लुटमार रोखण्यासाठी येत्या सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर बंद करणार - खा.डॉ.सुजय विखे पाटील श्रीगोंदा (प्रतिनिधी) गोर-गरीबांचे जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
श्रीगोंदा शहर येथील संत श्री शेख महाराज मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन वास्तूचा उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार राम शिंदे व विक्रमसिंह पाचपुते समोयोचित भाषणे झाली.
या प्रसंगी आ.बबनदादा पाचपुते, आ. श्री बाबासाहेब भोस, प्रताप भैय्या पाचपुते, नगराध्यक्षा सौ शुभांगीताई पोटे, उपनगरध्यक्ष सौ ज्योतीताई खेडकर, केशव मगर,बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की स्टॅम्प पेपरवर गोर-गरिबांच्या जमिनी हडपण्याचे काम मागील काळात याभागात मोठ्या प्रमाणावर झाले, त्यामुळे असे प्रकार राज्यात कुठेही होहु नये याकरिता राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टॅम्प पेपर हे बंद करून त्या ऐवजी आता फ्रँकिंग सिस्टीम ही सुरू होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास संमती दिली आहे. येत्या सहा महिन्यांत हे स्टॅम्प पेपर पूर्ण बंद होणार असल्याचे सांगून काही निर्णय घेताना सुरुवातीस थोडा त्रास होतो मात्र याचे दूरगामी चांगले परिणाम दिसतात.
वाळूचा असाच ऐतिहासीक निर्णय घेतला काही दिवस याचा त्रास होईल परंतु यातून वाढणारी गुन्हेगारी ही संपूर्णपणे थांबेल असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
राज्यात महायुतीचे सरकार एक वर्षापूर्वी सत्तेत आले, या एक वर्षात एकट्या श्रीगोंदा तालुक्यात आ. पाचपुते दादांनी शंभर कोटी रुपयांचे विकास कामे आणली, या विकास कामाचा शुभारंभ आता सुरू झाला असून माविआ सरकारच्या काळात एक फुटकी कवडी त्यावेळच्या राज्यकर्त्यानी दिली नाही आणि आज हेच लोक साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीत तोंड वर करून विचारतात हे किती आश्चर्यकारक आहे असे सांगताना खा.विखे यांनी १५ वर्षापासून रखडलेला साकळाई प्रकल्प हा होणारच असा शब्द आपण दिला असून तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे याप्रसंगी सांगितले. या प्रकल्पाच्या प्राथमिक कामास सुरुवात झाली असून पुढील सहा महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असे सांगितले.
येत्या सहा महिन्यांत या भागात अनेक विकास कामाचा शुभारंभ तर काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात झालेली दिसत असे सांगून ६३ कोटी रुपयाचा नवीन उड्डाणपूल देखील आपण मंजूर करून आणला असून लवकरच या कामाचेही भूमिपूजन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आपल्या एका मतदानाचा परिणाम हा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यावर होणारा असून आपलं एक मत टाकताना सर्वांनी फक्त आपल्या पुढच्या पिढीकडे पाहूनच ते द्यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन टर्म मध्ये आपल्या देशाला कुठून कोठे नेले आज आपला देश महासत्ता देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे, तो तसाच अधिकाधिक पुढे न्यायचा की पुन्हा अशा लोकांच्या ताब्यात द्यायचा याचा विचार आपण सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी भैय्या लगड,शहाजी हिरवे, बाळासाहेब गिरमकर, अनिल ढवाळ, मिलिंद दरेकर, बापू गोरे, पोपट खेतमाळीस तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी