ज्ञानाचा जणू फुलतोय मळा, घारगावची खोमणेमळा शाळा

By : Polticalface Team ,14-11-2023

ज्ञानाचा जणू फुलतोय मळा, घारगावची खोमणेमळा शाळा                                    
लिंपणगाव ( प्रतिनिधी ) आज ज्ञान हीच संपत्ती बनली आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यालाच जगात किंमत आहे कारण हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ज्ञान हवेच. म्हणून केवळ ज्ञानदान करणे हेच आपले कर्तव्य न मानता विद्यार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून काम करणारे शिक्षकही आहेत याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषदेच्या खोमणेमळा शाळेत येतोय. शाळेच्या प्रवेशद्वारा पासूनच सुंदर झाडे, बोलके वॉल कंपाउंड, ओळीने कुंडीत मांडलेली विविध फुलांची फुलझाडे, स्वच्छ, सुंदर शालेय परिसर पाहून टागोरांच्या शांतीवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आजूबाजूला झाडे कमी पण शाळापरिसर मात्र वृक्षराजींनी नटलाय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि मुलांच्या पाढ्यांच्या पाठांतराचा आवाज ऐकून या शाळेत ज्ञानाचा मळाच फुलल्यासारखे वाटते. सुमारे पाच वर्षापूर्वी बापूराव एकनाथ खामकर यांची बदली या शाळेत झाली. याआधीच्या फिरंगाई मळा शाळेतही त्यांनी पटसंख्या वाढवितानाच लोकसहभागातून ती शाळा सुंदर बनवली. प्रशासकीय बदली होऊनही नाराज न होता कर्तव्य भावनेने पहिल्या दिवसापासूनच येथे झपाटून कामाला सुरुवात केली. सकाळी साडेनऊ वाजता प्रज्ञाशोध परीक्षेच्या जादा तासाने या शाळेची सुरुवात होते. शंभर टक्के उपस्थिती असते. चाळीस पर्यंत पाढे मुले अगदी चुटकीसरशी म्हणतात. कोणताही प्रश्न विचारल्यावर लगेच उत्तर तयार असते. विशेष म्हणजे सर्वांची बोटे वर व उत्साहाने उत्तरे देतात. शाळेत विविध उपक्रम मुख्याध्यापक बापूराव खामकर व सहशिक्षिका अनिता कांबळे/माने राबवितात. हस्ताक्षर सुधार प्रकल्प हा पहिला उपक्रम. जानवी पानसरे, कुणाल खोमणे, सिदधी खोमणे, पार्थ खोमणे हे विद्यार्थी या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. वळणानुसार सराव, तज्ञांचे मार्गदर्शन, बोरु केलेले विविध पेन यासाठी वापरले जातात .त्यामुळे पहिली पासून शाळेतील सर्वांचेच हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर बनले आहे. यासाठी त्यांच्या स्वतंत्र वह्या आहेत. शिक्षक सराव घेतात. त्यानंतर चा उपक्रम झटपट वाचन. प्रज्वल जगताप व ऋतुजा खोमणे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व विद्यार्थ्यांचे बाराखडीनुसार वाचन घेतात. यासाठी शिक्षकांनी स्वतः तयार केलेले शब्दकार्ड, वाचनालयातील छोट्या गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करतात. स्वतंत्र विद्यार्थी वाचनालय असून विद्यार्थी स्वतः नोंदी करून पुस्तके घेतात व वाचन झाल्यावर नोंद करून ठेवून देतात. त्यामुळे सर्वच मुले अगदी सहजपणे वाचन करतात. शिक्षकांनी घेतलेल्या पाठातील घटकांचे स्वयंअध्ययन गटातून विद्यार्थी स्वतः अध्ययन करतात. या शाळेत कार्यानुभव व शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केली जाते. विद्यार्थी व शिक्षक या कार्यशाळेत विविध माती व कागदाचे साहित्य बनवितात. यासाठी त्यांना एनरॉईड स्मार्ट टिव्ही उपलब्ध असून यू ट्यूबवरील विविध व्हिडीओंचा त्यांना याकामी उपयोग होतो. हे साहित्य वर्षभर विद्यार्थी अध्ययनासाठी व शिक्षक पाठातील घटक शिकवताना वापरतात. भरपूर साहित्य दोन्ही वर्गात कार्यानुभव कोपऱ्यात पाहायला मिळते. तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत परसबागेतील भाजीपाल्याचा वापर केला जातो. संगितमय परिपाठ, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेसाठी ग्रामस्वच्छता भियानातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते. विशेष म्हणजे या दोन्ही शिक्षकांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील मिशन आपुलकी या उपक्रमातून शाळेतील सर्व भौतिक सुविधांसाठी लोकसहभाग उभा करून शाळेला स्वयंपूर्ण बनवले आहे. येथील पालकांनीही त्यासाठी अर्थिक योगदानाबरोबरच श्रमदानही केलेले आहे. येथील दानशूर पालक कै. बापूराव दादासाहेब खोमणे यांनी या शाळेस त्यावेळी सहा गुंठे जागा दान केली. शाळा विकासात त्यांचे योगदान मोलाचेच आहे. या शाळेने केंद्र व तालुकास्तरीय हस्ताक्षर, वेशभूषा सादरीकरण, सांस्कृतीक कार्यक्रमात यश मिळवितानाच राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेच्या या सर्व विकासात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग रावसाहेब खोमणे, उपाध्यक्षा सुप्रिया कानिफ खोमणे, माता पालक संघाच्या अध्यक्षा कल्याणी खंडेराव खोमणे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अरुण जगताप तसेच गावच्या सरपंच अरुणाताई खोमणे यांचे सहकार्य लाभत आहे. केंद सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळेच्या सर्वांगीण विकासाला महत्व दिले आहे . पण या शाळेत याची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाल्याचे पाहायला मिळते. खरंच मुख्याध्यापक बापूराव खामकर व सहशिक्षिका अनिता कांबळे/माने यांच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभले तर सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत असा ज्ञानाचा मळा फुलायला वेळ लागणार नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी