थू-थू आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर आळजापूर येथे शेतकरी ऊस उत्पादकांची बैठक संपन्न

By : Polticalface Team ,06-12-2023

थू-थू आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर आळजापूर येथे शेतकरी ऊस उत्पादकांची बैठक संपन्न करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे २८ नोव्हेंबर रोजी बोंबाबोब आंदोलन झाल्यानंतर, आता मकाई कारखान्यातील थकीत ऊस बिलासाठी दशरथआण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ॲड, राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी थू-थू आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी आळजापूर ता. करमाळा येथे स्थानिक शेतकऱ्यांची सहविचार बैठक संपन्न झाली. यावेळी या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये उपस्थिती लावली होती. या सहविचार सभेसाठी उपस्थित ॲड. राहुल सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले कि, ८ डिसेंबर रोजी थू-थू आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरे, महिला, लहान मुले घेऊन उपस्थित रहावे. मकाई कारखान्याचे नुतन चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी सुध्दा २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेत, माझी भेट घेऊन मला सांगितले कि, ५ डिसेंबर पासुन बिले देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवू नये. अशा प्रकारची विनंती केली आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. त्यामुळे फक्त आपण आपला रेटा ठेवणे गरजेचे आहे. असे मत ॲड. सावंत यांनी व्यक्त केले.
यानंतर प्रा. रामदास झोळ सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले कि, आजपर्यंत आपण आपल्या हक्काचे पैसे मागत असताना, न्यायिक मार्गाने मागितलेले आहेत. तरीसुद्धा आपल्याला बागलांनी कोणता ही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळेच आज आपल्याला रस्त्यावरील आंदोलन करावे लागत आहे. आता सदरचे आंदोलन हे आपल्या हक्काचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत थांबविले जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये इतरही कारखान्यांनी जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यावेळी प्रशासनाने त्यांच्यावर कोणती कारवाई झालेले आहे? याचा आम्ही पाठपुरावा करून तीच कडक कारवाई मकाई सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर करण्याचे मागणी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करत आहोत. अशा प्रकारे प्रा. झोळ यांनी सांगितले.
यानंतर दशरथअण्णा कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, आजपर्यंत आपण फक्त भूलथापांना बळी पडत आलो आहोत. तालुक्यातील जनतेला कोणी वाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. करमाळा तालुका म्हणजे एकेकाळी स्वर्गीय नामदेवराव जगताप यांच्या रूपाने, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानाच्या राजकारणाची पेरणी करणारा तालुका होता. त्या अनूषंगाने या तालुक्यातील शेतकऱ्यांनी षंड होऊन जगण्यापेक्षा बंड करून हक्क मिळविलेले बरे.... त्यामुळे येणाऱ्या ८ डिसेंबर रोजी आपल्या हक्कासाठी आपण बंड करत आहोत. जर मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे वेळीच अदा केले नाहीत. तर येणाऱ्या ८ डिसेंबर रोजी थू-थू आंदोलन करण्यात येणार आहे. सदरील आंदोलनामध्ये तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याच्यावर थूंकण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून, आपल्या उद्विग्न भावना व्यक्त करावयाच्या आहेत. अशा प्रकारचे आवाहन कांबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. तर तालुक्यातील इतरही गावात जाऊन आम्ही अशाच प्रकारे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचे काम दिवसें-दिवस करत राहणार असल्याचे कांबळे यांनी प्रशासन आणि तत्कालीन संचालक मंडळाला इशारा दिलेला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष