अन्यथा मागण्यांच्या पूर्ततेसाठी 18 डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे घारगाव येथील माता मंदिरात आमरण उपोषण

By : Polticalface Team ,20-12-2023

अन्यथा मागण्यांच्या पूर्ततेसाठी 18 डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे घारगाव येथील माता मंदिरात आमरण उपोषण
     लिंपणगाव( प्रतिनिधी)- शेतीमालाला तात्काळ हमीभाव मिळावा, यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात तमाम शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी धडपडत आहे. परंतु रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कोणत्याच पिक मालाला बाजार भाव मिळत नाही कधी कधी तर उत्पादन खर्च पण निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते. असे या निवेदनात म्हटले आहे
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की आज वाढती महागाई लक्षात घेता शेतीसाठी लागणाऱ्या पूरक गोष्टीचे बाजार भाव दिवसेंदिवस बाद होत चालले आहेत. त्यामध्ये खते, बी- बियाणे फवारणीसाठी लागणारे औषधे, डिझेल, मजुरी यांचे भाव शंभर पटीने वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणी येत चालला आहे, शेतकऱ्याने पिकवलेले पीक जोपर्यंत शेतामध्ये उभे असते, तोपर्यंत बाजारात त्या पिकाला चांगला बाजारभाव असतो. पण तेच पीक बाजारा घेऊन गेल्यावरती त्याचा बाजार पडलेला असतो आणि तेच पीक विकून झाल्यावर त्याचा बाजार वाढलेल असतो
असे सांगून शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी कपाशी तेरा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला ,आज तीच कपाशी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जाते .तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध आहे, त्यावेळेस त्या कांद्याला चार ते पाच रुपयाचा भाव दिला जातो. आणि शेतकऱ्याकडील कांदा संपल्यानंतर त्याच कांद्याला चाळीस ते पन्नास रुपयांचा दर दिला जातो. अशी वेळ शेतकऱ्यावरती कायम येते. शेतकऱ्याला वेळेवर पाणी नाही, लाईट नाही, खात्रीलायक बी बियाणे उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे खताचे व कीटकनाशकांचे बाजार भाव भरमसाठ वाढले आहेत. मागील काही दिवसापूर्वी गायीच्या दुधाला 35 ते 3८ रुपयाचा भाव मिळत होता पण आज त्याच दुधाला २४ ते २५ रुपये याप्रमाणे दर दिला जातो. या दराचा विचार करता शेतकऱ्याला दूध धंदा परवडत नाही, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती जनावरांच्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती या, सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी अडचणीत येत चालला आहे.
आज महाराष्ट्र भर आरक्षण या विषयावरती आंदोलने चालू आहेत. नेत्यांना व कारखानदारांना या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये इंटरेस्ट आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. याकडे लक्ष देण्यासाठी नेत्यांना व कारखानदारांना वेळ मिळत नाही. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्ता कधीकधी जातीपातीच्या नावाखाली तर कधी पार्टी पक्षाच्या नावाखाली वापर करून घेतला जातो. पण त्या शेतकऱ्याला व कार्यकर्त्याला न्याय व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. अशा भावना येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. प्रसंगी या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास गावच्या लक्ष्मी माता मंदिरात आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रामुख्याने शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाला दर वाढवून मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी, उसावरील इथेनॉल बंदी उठवावी आदी प्रमुख मागणीसाठी घारगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनावर संगीता खामकर, बापूराव निंभोरे, महेश पानसरे, शरद जगताप, राजेंद्र थिटे, शरद पाटोळे भूषण बडवे आदीसह 25 शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी