अन्यथा मागण्यांच्या पूर्ततेसाठी 18 डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे घारगाव येथील माता मंदिरात आमरण उपोषण
     
                      
                
            
               By : Polticalface Team ,20-12-2023
       
               
                           
              
       लिंपणगाव( प्रतिनिधी)- शेतीमालाला तात्काळ हमीभाव मिळावा, यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात तमाम शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी धडपडत आहे. परंतु रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कोणत्याच पिक मालाला बाजार भाव मिळत नाही कधी कधी तर उत्पादन खर्च पण निघत नाही. त्यामुळे  शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते. असे या निवेदनात म्हटले आहे
     जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की आज वाढती महागाई लक्षात घेता शेतीसाठी लागणाऱ्या पूरक गोष्टीचे बाजार भाव दिवसेंदिवस बाद होत चालले आहेत. त्यामध्ये खते, बी- बियाणे फवारणीसाठी लागणारे औषधे, डिझेल, मजुरी यांचे भाव शंभर पटीने वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणी येत चालला आहे, शेतकऱ्याने पिकवलेले पीक जोपर्यंत शेतामध्ये उभे असते, तोपर्यंत बाजारात त्या पिकाला चांगला बाजारभाव असतो. पण तेच पीक बाजारा घेऊन गेल्यावरती त्याचा बाजार पडलेला असतो आणि तेच पीक विकून झाल्यावर त्याचा बाजार वाढलेल असतो 
     असे सांगून शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी कपाशी तेरा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला ,आज तीच कपाशी सहा ते सात  हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जाते .तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध आहे, त्यावेळेस त्या कांद्याला चार ते पाच रुपयाचा भाव दिला जातो. आणि शेतकऱ्याकडील कांदा संपल्यानंतर त्याच कांद्याला चाळीस ते पन्नास रुपयांचा दर दिला जातो. अशी वेळ शेतकऱ्यावरती कायम येते. शेतकऱ्याला वेळेवर पाणी नाही, लाईट नाही, खात्रीलायक बी बियाणे उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे खताचे व कीटकनाशकांचे बाजार भाव भरमसाठ वाढले आहेत. मागील काही दिवसापूर्वी गायीच्या दुधाला 35 ते 3८ रुपयाचा भाव मिळत होता पण आज त्याच दुधाला २४ ते २५ रुपये याप्रमाणे दर दिला जातो. या दराचा विचार करता शेतकऱ्याला दूध धंदा परवडत नाही, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती जनावरांच्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती या, सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी अडचणीत येत चालला आहे.
आज महाराष्ट्र भर आरक्षण या विषयावरती आंदोलने चालू आहेत. नेत्यांना व कारखानदारांना या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये इंटरेस्ट आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. याकडे लक्ष देण्यासाठी नेत्यांना व कारखानदारांना वेळ मिळत नाही. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्ता कधीकधी जातीपातीच्या नावाखाली तर कधी पार्टी पक्षाच्या नावाखाली वापर करून घेतला जातो. पण त्या शेतकऱ्याला व कार्यकर्त्याला न्याय व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. अशा भावना येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. प्रसंगी या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास गावच्या लक्ष्मी माता मंदिरात आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
    प्रामुख्याने शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाला दर वाढवून मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी, उसावरील इथेनॉल बंदी उठवावी आदी  प्रमुख मागणीसाठी घारगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
       या निवेदनावर संगीता खामकर, बापूराव निंभोरे, महेश पानसरे, शरद जगताप, राजेंद्र थिटे, शरद पाटोळे भूषण बडवे आदीसह 25 शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष