उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा तसेच उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सीना जोड कालव्याच्या परिसरातील शेती पंपांना अखंडित वीजपुरवठा द्यावा,,,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मागणी

By : Polticalface Team ,29-12-2023

उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा तसेच उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सीना जोड कालव्याच्या परिसरातील शेती पंपांना अखंडित वीजपुरवठा द्यावा,,,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा, जून अखेर पर्यंत उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सिना जोडकालवा परिसरातील शेतीपंपाना अखंडीत वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्क्षतेखालील पार पडलेल्या बैठकीत मा. आ. नारायण पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की उजनी धरणामध्ये सध्या जेमतेम ९ टी एम सी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृत पाणी साठा म्हणून असलेल्या २० टी एम सी पाण्यात गाळाचे प्रमाण जादा असल्याने हे पाणी शेतीसाठी वापराने कठीण आहे. आता उजनी मध्ये पाणी येण्याचा कोणताही उपाय नाही. यामुळे आहे ते पाणी जून अखेर पर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. परंतु उजनी धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाच टी एम सी पाणी वापरता यावे म्हणून आगामी काळात जून अखेर पर्यंत या भागातील वीज पुरवठा तोडला जाऊ नये. उजनिचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णयावरून या अगोदर अनेकदा जिल्हाधिकारी यांनी उजनी बॅक वॉटर परिसरातील शेती पंपांची वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या परिसरात राज्यातील सर्वाधिक केळी लागवड असून वीजपुरवठा खंडित केल्यास करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होईल. यामुळे आगामी काळात होणाऱ्या संभाव्य निर्णयात आताच बदल केला जावा अशी मागणी आपण लेखी निवेदन देऊन केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. या अगोदर उजनी काठ परिसरातील जानेवारी ते मे या दरम्यान वीज पुरवठा आठ तासावरून एक तासावर आणणे, वीज कनेक्शन तोडणे हे प्रकार घडले आहेत आणि माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलन अथवा शेतकरी शिष्ट मंडळ समवेत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हे निर्णय बदल्यानास प्रशासनास भाग पाडले आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी अगोदर जागृत राहून संभाव्य वीज तोड होऊ नये अशी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी