लिंपणगावचे शेतकरी कुकडीच्या आवर्तनापासून वंचित पाण्यासाठी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव     
                      
                
            
               By : Polticalface Team ,02-01-2024
       
               
                           
              
       लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी चारी क्रमांक 132 मायनर मधून लिंपणगाव श्रीगोंदाकडे पाणी सोडण्यात आले. परंतु संबंधित कुकडीचे अधिकारी व पाणी वापर संस्थेच्या थकीत पाणीपट्टीच्या वादात लिंपणगावच्या शेतकऱ्यांना मात्र अक्षरशा रब्बी हंगामाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे लिंपणगावचे शेतकरी चांगलेच आक्रमक बनले असून, विसापूर सिंचन चे उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांना पाणी प्रश्न शेतकऱ्यांनी घेराव घातला आहे. याबाबत लिंपणगावचे माजी सरपंच अरविंद कुरुमकर व निलेश कुरुमकर यावेळी बोलताना म्हणाले की, सन 2019- 20 रोजी लिंपणगावचे क्षेत्र 48 हेक्टर असताना संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सदर क्षेत्र 285 हेक्टर म्हणजे 700 एकर क्षेत्र ओलिताखाली  दाखवल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामध्ये लिंपणगावच्या सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेवर संबंधित अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपये थकबाकी दाखवली गेल्याने लिंपणगावच्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेने रब्बी हंगामासाठी पाण्याची रीतसर कागदपत्रे मागणी करूनही संबंधित उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांनी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने लिंपणगावचे शेतकरी आणखीच आक्रमक बनले गेले आहेत. याबाबत सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन सदाशिव होले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की माझे घरगुती कार्यक्रम असल्याने मला पाण्याच्या मागणीकडे वेळ मिळाला नाही, परंतु तरीदेखील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आम्ही कुकडी कार्यालयात जाऊन रीतसर  पाणी मागणी अर्ज सादर केला आहे. असे असताना अधिकारी मात्र उडवडीचे उत्तरे देऊन आणि वापर संस्था व शेतकऱ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नसल्याचे श्री होले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
          दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने कमी पावसावर रब्बी हंगामाची पिके हाता तोंडाशी येत असतानाच जलसिंचन विभागाने कुकडीचे आवर्तन सोडले. परंतु जलसंपदा विभागाने पाण्याचे खाजगीकरण करून टेंडर नुसार शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाणी वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.  संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडे पाणी वापर संस्थेने मागणी करून देखील पाणी उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे हक्काचे पाणी पासून वंचित राहावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. याबाबत अधिकारी देखील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हक्काचे पाण्याची मागणी करत असताना शेतकऱ्यांना मात्र संबंधित अधिकारी पाणी वापर संस्थेकडे बोट दाखवतात. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित राहत असून या प्रकरणाला जबाबदार कोण? असा सवाल देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता कुकडीचे आवर्तन सोडल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध होते की नाही? हे पाहणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना याकडे मात्र संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. सद्यस्थितीला शेवटच्या शेतकऱ्याला कुकडीचे पाणी न मिळाल्यास हातात तोंडाशी आलेली रब्बीची पिके पाण्याअभावी भुई सपाट होतील त्यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. असे देखील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहेत. 
      दरम्यान श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी या वादग्रस्त ठरलेल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचे पहिलेच आवर्तन असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. अधिकारी मात्र वेळोवेळी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना वेठीस धरून पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. यासाठी आमदांर पाचपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. अन्यथा लिंपणगाव ची शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.    
     पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था लिंपणगावच्या शेतकऱ्यांची प्रत्येक वर्षी निर्माण होत आहे. त्यामध्ये चालू वर्षी देखील तेच घडले रब्बी हंगामाच्या पिकाला मात्र पाण्याची नितांत गरज असतानाही अधिकाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते. यासाठी आता शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असून, संबंधित कुकडी अधिकाऱ्यांच्या गलत्थान कारभाराच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. लिंपणगाव चे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही वेळोवेळी प्रत्येीक रब्बी व खरीप हंगामाची पाणी वापर संस्थेकडे पाणीपट्टी रोख स्वरूपात देत आहोत. परंतु या चारी वरील 48 हेक्टर क्षेत्र असताना 285 हेक्टर ओलिताखाली क्षेत्र दाखवल्याने शेतकरी मात्र चांगलेच आक्रमक बनले आहेत. पाणी न मिळाल्यास कुकडी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा लिंपणगाव चे माजी सरपंच अरविंद कुरुमकर, युवा नेते निलेश कुरुमकर, पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब कुरुमकर, अशोक होले, भरत वाल्हेकर, दीपक वाल्हेकर, लक्ष्मण वाल्हेकर, सुखदेव वाल्हेकर, आदींसह अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष