कुकडीच्या पाण्याचे खाजगीकरण शेतकऱ्यांच्या मुळाशी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी

By : Polticalface Team ,05-01-2024

कुकडीच्या पाण्याचे खाजगीकरण शेतकऱ्यांच्या मुळाशी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात 132 मायनर मधून आवर्तन सोडण्यात येते. परंतु दोन-तीन वर्षापासून या 132 मायनरचे पाणी शासनाने ऑनलाईन पद्धतीने टेंडर काढून ठेकेदाराकडे पाणी सोपवले असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हक्काच्या आवर्तनापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचेच उदाहरण लिंपणगावच्या शेतकऱ्यांना या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जलसिंचन विभागाकडे अनेक वर्षापासून पद भरती बंद असल्यामुळे या आवर्तन कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून प्रत्येक चारीवर पाणी वापर संस्थेकडे पाणी वाटपाचे नियोजन सोपवले. परंतु आवर्तन कालावधीत पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळते का नाही याकडे मात्र डुंकूनही पाहत नाही. ठेकेदार मात्र सात ते आठ तासात फक्त चारीला पाणी सोडतात आणि पुन्हा पाणी बंद करतात. वास्तविक पाहता कुकडी लाभक्षेत्रातील रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन महत्त्वाचे समजले जाते. शेतकऱ्यांनाही मोठी अपेक्षा या आवर्तनाची लागलेली असते. परंतु या पाण्याचे खाजगीकरण केल्यामुळे संबंधित अधिकारी मात्र कातडी बचाव अशी भूमिका घेतात. पुरेसे पाणी न मिळाल्यास वाद मात्र ठेकेदार आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अधिकारी मात्र सही सलामत बाजूला राहतात याकडे देखील शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्या चारीवर किती? क्षेत्र ओलिताखाली आहे? याकडे देखील संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला कागदपत्रे पटवून देण्याची आवश्यकता आहे. परंतु संबंधित ठेकेदार मात्र प्रत्येक चारीवर वाढीव क्षेत्र दाखवून पाणी वापर संस्थेच्या माथी मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी आकारतात त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे 132 मायनर चारीवर पाणी वाटपाचे धोरण मात्र शेतकऱ्यांच्या चांगलेच मुळाशी आल्याने शासनाने फेरविचार करून पाण्याचे खाजगीकरण न करता पाणी वापर संस्थांकडे पाणी हस्तांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा यापुढे पाण्यासाठी संघर्ष मात्र ेअसणार आहे. असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा तर ,ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाची पिके ही धोक्यात
श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काटणी करून उघड्यावर ठेवलेल्या कांद्याचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. तर रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक समजले जाणारे ज्वारी हरभरा गहू या पिकांचा टचदार दाना भरत असतानाच त्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या कणसावर लालसर रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकांवर देखील अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान एकीकडे श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड कुकडी मधून श्रीगोंदा तालुक्यात आवर्तने सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांची धडपड ही उभ्या पिकांना पाणी देण्याची असतानाच अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काटणी करून ठेवलेला कांदा सुरक्षितच झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी रात्रभर उठा ठेव सुरू झाली. त्यामध्ये अनेकांचा उघड्यावर ठेवलेला कांदा भिजल्याने या कांद्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
एकीकडे कांद्याचे भाव कोसळत असताना निसर्ग मात्र स्वच्छ वातावरण ठेवताना दिसत नाही. त्याचा दुष्परिणाम मात्र रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो त्यामध्ये कधी ढगाळ वातावरण तर कधी धुळीचे साम्राज्य त्यामुळे उभ्या पिकांना हे वातावरण निश्चितच दूषित ठरू शकते. विशेषता लागवड केलेल्या कांद्याचे या ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाठीवर पंप घेऊन विविध प्रकारचे औषध फवारणी करताना कांदा उत्पादकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे या रोगप्रतिबंधात्मक औषधांच्या किमती ही गगनाला भिडले आहेत. पदरी मात्र घोर निराशा होत असल्याचे कांदा उत्पादकांमधून बोलले जात आहे. कांदा उत्पादकांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील बदलामुळे मोठा आर्थिक बुरदंड होताना दिसतो. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती जगाचा पोशिंदा म्हणू आमच्याकडे सर्व जग पाहते. रात्रंदिवस कावड कष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य किंमत मिळेल ही अपेक्षा बळीराजा डोळ्यासमोर ठेवतो. मात्र ज्या वेळेस पिकवलेले उत्पन्न मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर मात्र आमच्या मालाची कवडीमोल किंमत होते .परंतु कोणत्याच मालाला हमीभाव नसल्याने कवडीमोल किमतीत कष्टातून पिकवलेले उत्पन्न व्यापारी मात्र मालामाल होतात. शेतकऱ्यांना मात्र काबाड कष्ट करून दारिद्र्याचे जीवन जगावे लागते. ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी