पारगाव सुद्रिक शिवारात कुकडीच्या पाण्याचा मोठा अपव्यय, मात्र लिंपण गावचे अनेक शेतकरी अद्यापही आवर्तनापासून वंचित- निलेश कुरुमकर
By : Polticalface Team ,18-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या वीस पंचवीस दिवसापासून रब्बी हंगामाचे पहिले कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. परंतु श्रीगोंदा तालुक्यात या कुकडीच्या पाण्याचा मोठा अपव्य होताना दिसत आहेत. आमच्या प्रतिनिधीने पारगाव सुद्रिक येथील 132 मायनर खाली असणाऱ्या चारीचे पाणी अक्षरशा ओढून आले व काटेरी झाडांमध्ये बेभामपणे वाहताना छायाचित्र टिपले आहे आहे त्यामुळे कुकडीच्या अधिकाऱ्यांचा आवर्तनाचा मोठा सावळा गोंधळ समोर येताना दिसला. एकीकडे शेतकरी रब्बी हंगामाच्या मुबलक पाण्याची अपेक्षा करत असताना या पाण्याचा मात्र श्रीगोंदा तालुक्यात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपव्य होताना दिसत आहे. ही बाब अत्यंत गंभीर दिसून येत आहे. दरम्यान लिंपणगाव येथील शेतकरी युवक नेते निलेश कुरुमकर यांनी मात्र कुकडीच्या पाण्याचे अधिकाऱ्यांकडून ढिसाळ नियोजन झाल्यामुळे लिंपण गावचे अनेक शेतकरी या रब्बी हंगामाच्या पहिल्याच आवर्तनापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. श्री निलेश कुरुमकर यांच्या म्हणण्यानुसार लिंपणगावकडे फक्त पाच ते सहा तास अधिकाऱ्यांशी संघर्ष करत आवर्तन सोडून पाणी तात्काळ बंद करण्यात आले. त्यामुळे लिंपणगावचे अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या पहिल्याच आवर्तनापासून वंचित राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगावची किसान पाणी वापर संस्था व अधिकाऱ्यांमध्ये आवर्तन कालावधीत समन्वय नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपुरे पाणी सोडले त्यामुळे अनेकांची पहिल्याच आवर्तनात भरणी रखडल्याने शेतकरी आक्रमक बनले आहेत. या आवर्तनाच्या संदर्भात युवा नेते निलेश कुरुमकर यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याशी उर्वरित शेतकऱ्यांना आवर्तने मिळावा म्हणून वेळोवेळी संपर्क केला, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप श्री कुरुमकर यांनी केला आहे.
निलेश कुरुमकर यांच्या म्हणण्यानुसार पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था लिंपणगावच्या शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. एकीकडे चालू वर्षी अत्यल्प पाऊस असल्याने आहे, त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. शेतकरी कुकडीच्या आवर्तनाची प्रतीक्षा करत असताना पाणी आले आणि कधी गेले हे मात्र शेतकऱ्यांना कळालेच नाही, अशी स्थिती लिंपणगावच्या शेतकऱ्यांची निर्माण झाल्याचा आरोप निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
पाणी वापर संस्था व कुकडीच्या अधिकाऱ्यांच्या वादामध्ये मात्र पहिल्याच रब्बी हंगामाच्या आवर्तनाला शेतकऱ्याांना मोठा संघर्ष करावा लागला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाणी वापर संस्थेच्या चेअरमनने आवर्तनाची मागणीच केली नाही तर पाणी वापर संस्थेची पाच लाखापर्यंत थकबाकी दिसून येते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर चेअरमन च्या म्हणण्यानुसार आम्ही कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात येऊन पाण्याची रीतसर मागणी केली आहे. असे असताना संबंधित अधिकारेी मात्र शेतकरी आणि पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गंभीर आरोप पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरील भरणी झाल्यानंतर लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना आवर्तन देऊ असे श्री वाळके यांनी सांगितले. परंतु सध्या पारगाव येथील फेरफटका मारल्यानंतर कुकडीचे पाणी बेफामपणे काटेरी झाडांमध्ये वाहताना दिसत आहेत. तेच पाणी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना दिले असते तर उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असता परंतु संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी लिंपणगावच्या चारीला तुटपुंजे पाणी सोडून अनेक शेतकरी आवर्तनापासून वंचित ठेवले आहे. वरील पाणी सोडताना मात्र पाण्याची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप देखील निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या बेफिकराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा निलेश कुरुमकर यांनी केला असून, या नुकसान भरपाई बाबत अधिकारीच जबाबदार राहतील, असा आरोप निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अधिकाऱ्यांना मात्र या प्रश्न आपण कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशाराही निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
वाचक क्रमांक :