लिंपणगाव काष्टी रेल्वे गेटवर ब्रेकर ला पांढरे पट्टे बसवा प्रवासी व वाहन चालकांची मागणी

By : Polticalface Team ,04-02-2024

लिंपणगाव काष्टी रेल्वे गेटवर ब्रेकर ला पांढरे पट्टे बसवा प्रवासी व वाहन चालकांची मागणी श्रीगोंदा (प्रतिनिधी )-लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेटवर तातडीने ब्रेकरला "पांढरे पट्टे" बसवा अशी मागणी प्रवास व वाहन चालकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान मुंबई उस्मानाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी हा काष्टी लिंपणगाव मार्गे दररोज वेगाने वाहत असून, या महामार्गावरून हजारो वाहने ये -जा करत असतात. परंतु लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटवर मागील महिन्यात भरधाव वेगाची वाहने रेल्वे गेटला धडकून मोठ्या प्रमाणावर अपघात झालेला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व रस्ते विकास महामंडळाने अपघात रोखण्यासाठी काष्टी आणि लिंपणगाव वरून मार्गस्थ होताना जागोजागी मोठमोठे ब्रेकर बसवले आहेत. परंतु या ब्रेकरवर पांढरा पट्टा नसल्याने वाहन चालकांना रात्री अपरात्री या ब्रेकरचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने आदळली जात आहेत. त्यातून मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते, असे प्रवासी वाहन चालकांमधून बोलले जात आहे. या दोन्ही बाजूंनी ब्रेकरवर पांढरे पट्टे बसवल्यास निश्चितपणे अपघाताला आळा बसू शकतो ,अन्यथा अपघाताची मालिका पुन्हा सुरू होऊ शकते त्यातून अनेकांचा निष्पाप बळी देखील जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यामध्ये रात्री अचानक चार चाकी वाहनाला ब्रेकरमुळे अपघाताला सामोरे जावे लागले. नशीब बलवत्तर म्हणून वाहनांमधील प्रवासी बालनबाल बचावले. दरम्यान सदरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी हा काँक्रिटीकरण करून दुपारीकरण करण्यात आल्यामुळे अनेक हजारो वाहने सुसाट वेगाने दूरवरून ये -जा करतात. त्यामध्ये रात्री हा रात्री अचानक हृदयविकार व अक्सिडेंट झालेल्या रुग्णांना या महामार्गावरून खाजगी आगर ऍम्ब्युलन्सच्या वाहनांना या ब्रेकरवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन आदळल्यास त्या रुग्णाचा रेल्वे गेटवर पांढऱ्या पट्ट्या अभावी जागेवरच रुग्ण दगावू शकतो. अशी देखील प्रवासी व वाहन चालकांमधून बोलले जाते. त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर रेल्वे प्रशासनाने तातडीने या जागोजागी ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे बसावेत, अशी मागणी प्रवासी व वाहन चालकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी