किल्ले धर्मवीरगड ते रायगड धर्मवीर रथयात्रा

By : Polticalface Team ,08-02-2024

किल्ले धर्मवीरगड ते रायगड धर्मवीर रथयात्रा

    श्रीगोंदा ( प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून श्रीगोंदेकरांचे इमान रायगडाच्या मातीशी राहिलं आहे. श्रीगोंदे तालुक्यांतील एकमेव किल्ला धर्मवीरगड.पांडे पेडगावचा किल्ला, बहादूरगड या नावानेही ओळखला जातो.

या किल्ल्याच्या परिसरात खूप मोठा इतिहास घडला आहे.छत्रपती संभाजी महाराजांवरील अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार हा किल्ला आहे.१फेब्रु. १६८९ रोजी पकडले गेले. त्यानंतर परत कधीच रायगड भेट झाली नाहीं. 

शिव राज्याभिषेक सोहळयाचा खर्च भरुन काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बहादुर खानची केलेलीं फजिती. "पेडगावचा शहाणा" म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे.


 गडकिल्ले संवर्धन व श्रीगोंदे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने यावर्षी प्रथमच किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड अशी रथयात्रा  आयोजन केले आहे. दिनांक १० व ११ फेब्रुवारी रोजी ही रथयात्रा दोन दिवसांत किल्ले रायगड येथिल महादरवाजा येथे पोहचेल.महादरवाजा  येथेच समाप्त होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल.सहभागी सर्वांना सर्व गडाची माहिती सांगितली जाईल. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध उलगडून सांगितला जाईल.

 दोन्ही राजांचा संबंधाने श्रीगोंदा व पेडगाव इथे इतिहास घडलाय. इतिहास जपणे आपले कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे रथ यात्रा! छत्रपती संभाजी महाराजांचा धीरोदात्त शौर्याचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड. शिघ्रकवी कविकलश यांची  शेवटची  इतिहास प्रसिद्ध रचना "यावन रावण की सभा" किल्ले धर्मवीरगड येथे  घडून आली. श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी "श्रीगोंदे टोक" नाव दिले होते.श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे किल्ले रायगड येथे धर्मवीर  रथ यात्रा.

अशी माहिती शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी