By : Polticalface Team ,08-02-2024
श्रीगोंदा ( प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून श्रीगोंदेकरांचे इमान रायगडाच्या मातीशी राहिलं आहे. श्रीगोंदे तालुक्यांतील एकमेव किल्ला धर्मवीरगड.पांडे पेडगावचा किल्ला, बहादूरगड या नावानेही ओळखला जातो.
या किल्ल्याच्या परिसरात खूप मोठा इतिहास घडला आहे.छत्रपती संभाजी महाराजांवरील अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार हा किल्ला आहे.१फेब्रु. १६८९ रोजी पकडले गेले. त्यानंतर परत कधीच रायगड भेट झाली नाहीं.
शिव राज्याभिषेक सोहळयाचा खर्च भरुन काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बहादुर खानची केलेलीं फजिती. "पेडगावचा शहाणा" म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे.
गडकिल्ले संवर्धन व श्रीगोंदे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने यावर्षी प्रथमच किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड अशी रथयात्रा आयोजन केले आहे. दिनांक १० व ११ फेब्रुवारी रोजी ही रथयात्रा दोन दिवसांत किल्ले रायगड येथिल महादरवाजा येथे पोहचेल.महादरवाजा येथेच समाप्त होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल.सहभागी सर्वांना सर्व गडाची माहिती सांगितली जाईल. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध उलगडून सांगितला जाईल.
दोन्ही राजांचा संबंधाने श्रीगोंदा व पेडगाव इथे इतिहास घडलाय. इतिहास जपणे आपले कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे रथ यात्रा! छत्रपती संभाजी महाराजांचा धीरोदात्त शौर्याचा साक्षीदार किल्ले धर्मवीरगड. शिघ्रकवी कविकलश यांची शेवटची इतिहास प्रसिद्ध रचना "यावन रावण की सभा" किल्ले धर्मवीरगड येथे घडून आली. श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी "श्रीगोंदे टोक" नाव दिले होते.श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे म्हणून जाणार आहे किल्ले रायगड येथे धर्मवीर रथ यात्रा.
अशी माहिती शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांनी दिली.
वाचक क्रमांक :