मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : मनोज जरांगे पाटील

By : Polticalface Team ,10-02-2024

मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : मनोज जरांगे पाटील

श्रीगोंदा (प्रतिनिधी):- अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यापर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी श्रीगोंदा येथे सांगितले. लाखो मराठ्यांच्या मुलांचे भलं होणार आहे. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता खरपूस शब्दात त्याचा समाचार घेतला.

      श्रीगोंदा आढळगाव रोड वरती औटेवाडी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ व राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, आता टोळी मुकादम सावध झाला. आतापर्यंत टोळी मुकादमाने पडद्या आडून तीन वेळा मराठ्यांचे आरक्षण घालविले. नाव न घेता तुला अक्कल असती तर जेलमध्ये कांदें खायला गेला नसता. आरक्षण मिळू दे मग झटका दाखवतो, असा इशारा त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता दिला.


जरांगे यांच्या उपोषणाने मोर्चाने मराठ्यांना नेमक काय मिळाले, असे म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो की गल्लीबोळात बडबड करणाऱ्या नेत्यांना काय माहित आरक्षणाचा अध्यादेश निघाला आहे. त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होणार आहे, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही खरपूस समाचार घेतला. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली. मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. ते म्हणाले आता रायगडावर जाऊन राजांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे. मी असेन नसेन माहीत नाही माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका. असे आवाहन त्यांनी मराठा बांधवाना केले. तसेच येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. याप्रसंगी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातून जवळपास लाखोंच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले.

      समाजावर प्रेम असेल तर दोन दिवसात अधिवेशन बोलवा

जर सरकारचे मराठा समाजावर प्रेम असेल तर त्यांनी अवघ्या दोन दिवसात अधिवेशन बोलवून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.



     प्रत्येकाने आपल्या आमदारांकडे मागणी करा

येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यासाठी आग्रही व्हा, अशी मागणी सर्वांनी आपल्या आमदाराकडे फोन करून करावी. विधानसभेत जो आमदार आपल्या बाजूने बोलेल तोच आपला आमदार असेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी