By : Polticalface Team ,14-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) दि.६ फेब्रूवारी २०२४. दूपारी ३-३० वाजता.. राज्यातील शिक्षकैतरांचा पदभरती आणि पदोन्नतिचा मार्ग मोकळा. झाल्याने राज्यातील शिक्षकेतरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे
दरम्यान शिक्षकेतरांच्या पदभरती आणि पदोन्नतीच्या पदास आज मा.न्यायालयाने बंदी ऊटविन्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला, असल्यामूळे लवकरच शालेय शिक्षण विभाचाचा आदेश पारित होणार असून, नव्याने सरळसेवा भरती आणि पदोन्नताचा विषय मार्गी लागणार आहे. यासाठी "शिक्षकेतर महासंघ," चे मा.अध्यक्ष वाल्मिकराव सुरासे यांच्या खास प्रयत्नामूळेच ही बंदी ऊठविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करित होते. त्याला आज खर्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने यश मिळाले आहे. असे राज्य समन्वयक एस डी डोंगरे व राज्यसचिव पाराजी मोरे यांनी सांगितले. अधिक माहिती देताना श्री डोंगरे पुढे म्हणाले की, दिनांक २८ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयास असलेली बंदी पूर्णत: उठविण्यात आलेली आहे . राज्यातील या माध्यमिक शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्नासाठी महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानेच महासंघाला यश आल्याचे राज्य संघटक एस डी डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीकराव सुरासे यांनी राज्यातील शिक्षकेतरांच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात वेळोवेळी पुरेपूर वेळ देऊन शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून राज्यातील शिक्षकेतरांच्या व्यथा मांडल्या व त्याचा पाठपुरावा कायम ठेवल्याबद्दल अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष पाराजी मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नंदकुमार कुरुमकर, परशुराम वेताळ, भाऊसाहेब धनवटे, सतीश बडदे, राजू दुबळ, अशोकराव आळेकर, गणेश पवार, तौसिफ शेख, भाऊसाहेब पेटकर आदींनी राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीकराव सुरासे सर यांचे विशेष असे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :