By : Polticalface Team ,17-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात झाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा १० फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवडी येथील देवराम गुलाब घोगरे हे देखील (दि.१४ फेब्रुवारी) पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधीसुचानेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी जारांगे पाटील १० फेब्रुवारी २०२४ पासून आमरण उपोषणास बसले आहेत. सद्या त्यांची प्रकृती चिंतजनक आहे.
त्यांना पाठिंबा म्हणून आता श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवडी येथील देवराम गुलाब घोगरे हे देखील उपोषणाला बसले आहेत. घोगरे व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे निवेदन देण्यात आले होते .श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असतात .
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात झाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटीलांच उपोषण जोपर्यंत चालू आहे . तोपर्यंत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू राहील - देवराम घोगरे.
वाचक क्रमांक :