By : Polticalface Team ,21-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले कौशल्य विकसित करावे त्याबरोबरच मुलांनी आपल्या आई-वडिलांची जाणीव ठेवूनच पुढील उच्चध्येय गाठावे असे गौरवदगार मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मनीषा मडके यांनी व्यक्त केले.
लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी दिवंगत प्रभाकर मडके यांच्या तृतीय स्मरणार्थ श्री व्यंकनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वडिलांच्या स्मरणार्थ उच्चपदस्थ अधिकारी श्रीमती मनीषा मडके व माधुरी मडके यांनी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी उपस्थित या दोन्ही उच्च पदस्थ अधिकारी भगिनींचे विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कक्ष अधिकारी श्रीमती मनीषा मडके यावेळी म्हणाल्या की, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना तिथेच आपल्या शिक्षणाचा पायाभरणी होते. संस्काराचे उत्तम प्रकारे धडे देखील मिळतात. त्यातून प्रेरणा मिळते व पुढील आयुष्यासाठी हा महत्त्वाचा रोल असतो. असे सांगून श्रीमती मडके आणखी पुढे म्हणाल्या की, शिक्षकांबरोबर आपल्या आई-वडिलांचे देखील संस्कार महत्त्वाचे ठरतात. म्हणून प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची देखील जाणीव ठेवावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी मुंबई नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी मडके यावेळी बोलताना म्हणाल्या की, शालेय जीवनात मुलांनी आपल्या आई-वडिलांबरोबर शिक्षकांनी दिलेले संस्कार अंगी करावेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर कोणत्या क्षेत्राची निवड करावयाची आहे, ते ध्येय निश्चित करावे त्या दृष्टीनेच आपला सातत्याने प्रयत्न असला पाहिजे असे सांगितले.
यावेळी इंडियन सिविल अकाउंट सर्विसचे अधिकारी श्री अभिजीत सरकटे यावेळी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, तेथे मात्र ध्येयाने सामोरे गेले पाहिजे. निश्चित यश मिळते असा सल्ला यावेळी श्री सरकटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी म्हणाले की, शालेय जीवनात सतत अभ्यास व ज्ञानाला अत्यंत महत्त्व असते. या मडके भगिनींनी वडिलांची प्रतिकूल परिस्थिती असताना देखील उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या भगिनींचा विद्यार्थ्यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपणही उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल ठेवावी असे सांगून उपस्थिती या अधिकाऱ्यांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली .
यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री संजय दळवी यांनी केले. आभार उपशिक्षक श्री आनंदा पुराणे यांनी मानले.
वाचक क्रमांक :