विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कठोर परिश्रम घेऊन आपले कौशल्य विकसित करावे -कक्ष अधिकारी मनीषा मडके

By : Polticalface Team ,21-02-2024

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कठोर परिश्रम घेऊन आपले कौशल्य विकसित करावे -कक्ष अधिकारी मनीषा मडके

  लिंपणगाव (प्रतिनिधी)- शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले कौशल्य विकसित करावे त्याबरोबरच मुलांनी आपल्या आई-वडिलांची जाणीव ठेवूनच पुढील उच्चध्येय गाठावे  असे गौरवदगार मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मनीषा मडके यांनी व्यक्त केले.


     लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी दिवंगत प्रभाकर मडके यांच्या तृतीय स्मरणार्थ श्री व्यंकनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वडिलांच्या स्मरणार्थ उच्चपदस्थ अधिकारी श्रीमती मनीषा मडके व माधुरी मडके यांनी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी उपस्थित या दोन्ही उच्च पदस्थ अधिकारी भगिनींचे विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते.


      यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कक्ष अधिकारी श्रीमती मनीषा मडके यावेळी म्हणाल्या की, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना तिथेच आपल्या शिक्षणाचा पायाभरणी होते. संस्काराचे उत्तम प्रकारे धडे देखील मिळतात. त्यातून प्रेरणा मिळते व पुढील आयुष्यासाठी हा महत्त्वाचा रोल असतो. असे सांगून श्रीमती मडके आणखी पुढे म्हणाल्या की, शिक्षकांबरोबर आपल्या आई-वडिलांचे देखील संस्कार महत्त्वाचे ठरतात. म्हणून प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची देखील जाणीव ठेवावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.


       याप्रसंगी मुंबई नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी मडके यावेळी बोलताना म्हणाल्या की, शालेय जीवनात मुलांनी आपल्या आई-वडिलांबरोबर शिक्षकांनी दिलेले संस्कार अंगी करावेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर कोणत्या क्षेत्राची निवड करावयाची आहे, ते ध्येय निश्चित करावे त्या दृष्टीनेच आपला सातत्याने प्रयत्न असला पाहिजे असे सांगितले.


         यावेळी इंडियन सिविल अकाउंट सर्विसचे अधिकारी श्री अभिजीत सरकटे यावेळी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, तेथे मात्र ध्येयाने सामोरे गेले पाहिजे. निश्चित यश मिळते असा सल्ला यावेळी श्री सरकटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी दिला.


      यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी म्हणाले की, शालेय जीवनात सतत अभ्यास व ज्ञानाला अत्यंत महत्त्व असते. या मडके भगिनींनी वडिलांची प्रतिकूल परिस्थिती असताना देखील उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या भगिनींचा विद्यार्थ्यांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपणही उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल ठेवावी असे सांगून उपस्थिती या अधिकाऱ्यांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली . 


   यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री संजय दळवी यांनी केले. आभार उपशिक्षक श्री आनंदा पुराणे यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी