लिंपणगावमध्ये नियमित पाणी न सुटल्यामुळे महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव

By : Polticalface Team ,04-03-2024

लिंपणगावमध्ये नियमित पाणी न सुटल्यामुळे महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणाऱ्या खुद्द लिंपणगावात सार्वजनिक विहिरीमध्ये पाणी असूनही पाणी सुटत नसल्याने गावच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. दरम्यान महिलांचे म्हणण्यानुसार गावच्या सार्वजनिक विहिरींना मुबलक पाणी असताना वेळेत पाणी सुटत नाही, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना देखील नादुरुस्त विद्युत पंप दुरुस्त करण्यास सांगूनही या विद्युत पंपाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लिंपणगावच्या जवळपास नऊ महिन्यापासून पाण्यासाठी महिला व पुरुषांची मोठी भटकंती सुरू असून, आज सोमवारी चार मार्च रोजी महिलांनी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांना घेराव घालून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतचे काही सदस्य देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंडेकरवाडी नजीक घोड कॅनॉलच्या च्या पायथ्याशी असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीला मुबलक पाणी आहे परंतु तेथील विहिरीवरील विद्युत पंप गेल्या नऊ महिन्यापासून नादुरुस्त आहे. ग्रामस्थांनी या नादुरुस्त विद्युत पंपाची दुरुस्ती करून तातडीने गावाला पाणीपुरवठा सोडण्याची मागणी केली. परंतु ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ व महिलांनी केला आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आता उन्हाळी हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीला लिंपणगावमध्ये दोन सार्वजनिक विहिरी असून सिद्धेश्वर मंदिरालगत एक सार्वजनिक विहीर तर दुसरी विहीर घोड कॅनॉलच्या पायथ्याशी आहे. या विहिरींना मुबलक पाणी आहे, परंतु विद्युत पंपा अभावी मात्र गावचा पूर्णतः पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप महिला व ग्रामस्थांमधून केला जात आहे. एक मार्चपासून घोड चे आवर्तन सुरू झालेले आहे. त्यातून सार्वजनिक विहिरीत पाणी सोडले जाते. परंतु तेथील विद्युत पंपच बंद असल्याने पाणीपुरवठ्याचा मोठा बट्ट्याबोळ झालेला आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे कार्यकारी अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी पाहिले जाते परंतु ग्रामविकास अधिकारी या पाणी प्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने पाणी असून खोळंबा व नसून अडचण अशी स्थिती लिंपणगावची बनलेली आहे. त्यामध्ये आठ मार्च रोजी गावची महाशिवरात्र असल्याने ग्रामस्थ व महिलांना पाण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. दोन दिवसात गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा गावातील प्रमुख महिला व ग्रामस्थांनी यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्यांनी देखील सार्वजनिक विहिरीवरील नादुरुस्त विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या परंतु सदस्यांना देखील ग्रामविकास अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने गावचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. दरम्यान ग्रामस्थांचे म्हणण्यानुसार श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लिंपणगाव या मोठ्या लोकसंख्येच्या गावाकडे किमान पाणी प्रश्न संदर्भात तरी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ग्रामस्थ व महिला पंचायत समितीच्या कार्यालयासमोर हंडा मोर्चा आणून आपल्या तीव्र भावना मांडणार आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लिंपणगावच्या पाणी प्रश्न संदर्भात आढावा घेऊन संबंधित ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांना तातडीने सूचना द्याव्यात अशी देखील मागणी ग्रामस्थ व महिलांमधून होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष