आश्वासित प्रगती योजना शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक शासन आदेश त्वरित रद्द करावा- राज्य शिक्षकेतर महासंघाची मागणी

By : Polticalface Team ,16-03-2024

आश्वासित प्रगती योजना शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक शासन आदेश त्वरित रद्द करावा- राज्य शिक्षकेतर महासंघाची मागणी

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 11/3/24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारणा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही 1/1/ 24 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला 14 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागणी तसा आदेशही काढला परंतु हा निर्णय राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो शासन निर्णय तात्काळ रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी राज्य शिक्षकेतर महासंघाने केली आहे.


    राज्य शिक्षकेतर महासंघाच्या मागणीनुसार शासनाने 12 -24 ही आश्वासित प्रगती योजना लागू करायची होती तर ती शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच लागू करावी जर 16, 17 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी पद भरती बंद आहे त्यामुळे शासनाने आदेशद्वारे 1-1- 24 नंतर या लाभाचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काडी मात्र फायदाच होणार नाही, ही आश्वासित प्रगती योजना मग द्यायचीच कशाला? असा सवाल देखील राज्य शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी अधिक माहिती देताना राज्य महासंघाचे महासचिव पाराजी मोरे यांनी म्हटले आहे की, आश्वासित प्रगती योजना शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाणेच शालेय शिक्षण विभागाला देखील त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे, शालेय शिक्षण विभागालाच असा अन्यायकारक निर्णय कशासाठी? अशी आमची ठाम मागणी व भूमिका आहे. असे महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुरासे व महासचिव पाराजी मोरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भात राज्य महासंघाने मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठांमध्ये या निर्णयाबाबत याचिका दाखल केलेलीच आहे. मात्र ती अद्यापही रिट याचिका मागे घेतलेली नाही. असा दावा देखील राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे 26 मार्च 2024 रोजी यासंदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे. मा. न्यायालय शिक्षकेतरांच्या बाबतीत कदापिही अन्यायकारक निर्णय देणार नाही. याची राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खात्री आहे. मा. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असणार आहे. जोपर्यंत राज्यातील शिक्षकेतरांना खरोखर न्याय मिळणार नाही, त्यासाठी राज्य महासंघ प्रयत्न चालूच ठेवणार आहे.


     राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारने अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत शिक्षकेतर महासंघाचे पदाधिकारी कोणताही खाजगी व सार्वजनिक सभेतील सत्कार स्वीकारणार नाही. अशी ठाम भूमिका राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मा न्यायालय यासंदर्भात जो निर्णय देईल, त्या संदर्भात तात्काळ शासनाला तो निर्णय कळविला जाईल, अशी भूमिका राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे व महासचिव पाराजी मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या प्रश्नासंदर्भात राज्य महासंघाचे सहकार्यवाह केशव पाटील, समन्वयक एस डी डोंगरे, राजकुमार चैणानी, मार्गदर्शक समशेर पठाण, राजू पठाण आदी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज्यातील शिक्षकेतरांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी पाठपुरावा करत असून तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती महासंघाचे सचिव पाराजी मोरे यांनी यावेळी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.