दळवींच्या निधनाने प्रशासनाची कधीही भरून न येणारी हानी -गटविकास अधिकारी फराटे
By : Polticalface Team ,19-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अहमदनगर येथे ग्रामपंचायत विभागामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुभाष दळवी यांचे रविवारी अपघाती निधन झाले. सोमवार दिनांक 18 रोजी श्रीगोंदा पंचायत समिती येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी राणीताई फराटे म्हणाल्या की प्रशासनात काम करताना काही कर्मचारी असे असतात की त्यांना आपण आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच पाहतो. दळवी यांनी श्रीगोंदा पंचायत समिती येथे कार्यरत असताना देखील चांगले काम केले. त्यांच्या अकाली जाण्याने प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची जागा कधीही न भरून निघणारी आहे.
कर्मचारी युनियनचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नागेश लोखंडे म्हणाले की दळवींच्या जाण्याने प्रशासनाचे अतोनात नुकसान तर झालेलेच आहे परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाची कधीही न भरून येणारी मोठी हानी झालेली आहे. दळवींनी आपल्या कार्यांचा वेगळा ठसा जिल्हा परिषदेमध्ये उमटवला होता. या दुःखद प्रसंगी दळवी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हीच दळवींसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकुंद पाटील, कृषी अधिकारी डॉ. रामकृष्ण जगताप, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष नागेश लोखंडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी दीपक समुद्र, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, पोपटराव यादव, सारिका हराळ. मनोज बनकर, उप अभियंता प्रकाश पाचनकर, काकासाहेब खोसे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी