श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडावे शेतकऱ्यांची मागणी, तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पाणी पातळीत मोठी घट

By : Polticalface Team ,22-03-2024

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडावे शेतकऱ्यांची मागणी, तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पाणी पातळीत मोठी घट

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- उन्हाची तीव्रता अत्यंत वेगात सुरू होत असतानाच पाणी पातळीत देखील तितकीच घट होताना दिसते. त्यामुळे चालू वर्षी पाणीटंचाईला सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीला श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड लाभक्षेत्रात आवर्तन सुरू आहे व कुकडी लाभक्षेत्राचे आवर्तन सध्या कर्जत करमाळा कडे पूर्ण दाबाने सुरू आहे. परंतु श्रीगोंदा तालुक्यात मात्र अद्यापही पूर्ण दाबाने कुकडीचे आवर्तन सुरू नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे चालू वर्षी अत्यल्प पाऊस असल्याने जमिनीतील पाणीसाठा पूर्णतः संपुष्टात आला आहे.  सद्यस्थितीला तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात शेतकरी व ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला तीव्र मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. सर्वत्र गावतळी व बंधारे पाण्याअभावी कोरडे पडली आहेत जनावरांना देखील पाणी उरले नाही त्यामुळे जनावरे देखील पाण्यासाठी हंबर्डा फोडताना दिसत आहेत. त्यामुळे पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात निर्माण झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी जीवन जगताना दिसतो आहे. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात 132 मायनर खालील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान कुकडी खालील लाभक्षेत्रात फळबागा, उन्हाळी पिके, ऊस, जनावरांचा चारा पाण्याअभावी अंतिम घटकात आहे. उन्हाळी हंगामात कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात पूर्ण दाबाने सुटले तरच पाणीटंचाई काही अंशी दूर होऊ शकते. अन्यथा उन्हाळी हंगामातील पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी पिके, खोडवा ऊस कांदा भुईमूग इत्यादी पिके भोईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. 


     सद्यस्थितीला कुकडीचे आवर्तन कर्जत करमाळ्याकडे जवळपास 25 ते 30 दिवसापासून सुरू आहे जलसंपदा विभागाने टेल टू हेड हे धोरण निश्चित केल्यामुळे श्रीगोंदेकरांना पूर्ण दाबाने पाणी केव्हा? मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीला शेतकरी कोणत्याच शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी तणावाखाली जीवन जगताना दिसतो आहे. त्यामध्ये मागील वर्षी पाऊस अत्यंत अत्यल्प असल्याने विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याने देखील तळ घाटला आहे. तितकेच शेतकरी पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी मागणी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे तशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कारण उन्हाळी हंगामात कुकडीचे हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळी हंगामाचे दोन महिने अत्यंत थरारक असणार आहेत. सद्यस्थितीला कुकडी लाभक्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांची भटकंती सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळी हंगामाचे हे आवर्तन पूर्ण दाबाने सोडले तरच काही अंशी पाणीटंचाई शिथिल होऊ शकते. तशा देखील भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.


       मिळालेल्या माहितीनुसार कुकडी लाभक्षेत्रात जलसंपदा विभागाने प्रत्येक मायनरवर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पाणी वापर संस्थांना पाणी वाटप सुरू केलेले आहे. त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांना मागणीनुसार पाणी मिळते की? नाही? याबाबत कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण पाणी वापर संस्था व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे हितसंबंध पाहता आवर्तन कालावधीत वाढीव क्षेत्र दाखवून संबंधित कॉन्ट्रॅक्टर पाणी वापर संस्थांच्या नावावर आवर्तन कालावधीत पाणीपट्टी देखील वाढीव दाखविली जाते. त्याचा आर्थिक बोजा नाहक शेतकऱ्यांवर वाढीव दाखवला जातो. असाच प्रकार मागील आवर्तन कालावधीत घडल्याने पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांमध्ये या प्रश्न मोठा वादंग निर्माण झाला होता. आजही तो प्रश्न एका पाणी वापर संस्थेचा अद्याप अनुत्तरीय आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात याबाबत संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळी हंगामातील आवर्तनावर नियंत्रण ठेवून शेवटच्या शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळाले पाहिजे याची देखील खबरदारी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. कालवा सल्लागार समितीने देखील याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अन्यथा या आवर्तना संदर्भात संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल, हे देखील तितकेच सत्य आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष