रमजानुल मुबारक ११ -इन्सानियत हाच मोठा धर्म

By : Polticalface Team ,22-03-2024

रमजानुल मुबारक ११  -इन्सानियत हाच मोठा धर्म

                रमजान महिन्याचा पहिल्या दहा दिवसांचा भाग (अशरा) काल पूर्ण झाला आहे.रहेमत (कृपादृष्टी) चा हा काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी) चा दुसरा भाग आज सुरु झाला आहे. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन,विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे, त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही.कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती, सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहे.अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआन मधील आयता सारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्यात कुणी यशस्वी होऊ शकला नाही.त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ईश्वरीय ग्रंथ आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरु केला, त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अधापतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते.गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला.त्यांनी अल्लाह कडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला.सुरुवातीला हे सर्व आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधकही समर्थक बनले. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. इन्सानियत (मानवता), समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला.आपण सर्व समान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही. सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या. 

मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली.अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला.

 आपसातील भांडण, तंटे,वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली.सुख,दुःख,हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रति तुमची ही काही कर्तव्ये आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले.

 स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला.जो ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली. 

जगभरातील सर्व मानव हे ईश्वराचे भक्त आहेत. त्यामुळे कोणीही आपसात द्वेष बाळगू नका ही शिकवण त्यांनी दिली. हजरत पैगंबर यांच्या याच शिकवणुकीनुसार आम्ही श्रीरामपूरमध्ये पयामे इन्सानियत फोरम या सामाजिक सेवेचे कार्य करणाऱ्या संघटनेचे मानवता संदेश फाउंडेशन या नावात रूपांतर करून शहरांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि या आमच्या कार्याला समाजातील सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणात साथ देत आहेत.धर्म कोणताही असला तरी सर्वांचा उद्देश मानवता अर्थात इन्सानियत हाच आहे आणि या कामासाठी पुढे येणारे लोक समाजामध्ये मोठ्या संख्येने आहेत याची प्रचिती वारंवार येते आहे.सामाजिक उत्तरदायित्वासाठी योगदान देणाऱ्या अशा सर्वधर्मीय मित्रांना या रमजानच्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने मनापासून धन्यवाद.(क्रमशः)   

                    *सलीमखान पठाण*

                       9226408082.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी