By : Polticalface Team ,29-03-2024
करमाळा प्रतिनिधी
आपले अधिकार वापरुन करमाळा तालुक्यातील उजनीकाठची पिके धोक्यात येतील असा वीज कपातीचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेऊ नये, अन्यथा पाटील गट समर्थक लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी सविस्तरपणे हा विषय मांडताना सांगितले की उजनी धरणाच्या निर्मीतीसाठी माझ्या करमाळा तालुक्यातील ३७ गावांनी त्याग केला आणि आपल्या चांगल्या वहित जमिनी, राहती घरे, गावे पाण्याखाली घातली. धरणग्रस्त शेतकऱ्यांना दोन टिएमसी पाणी राखीव असल्याने वीज कपात करुन त्यांच्या हक्काची पायमल्ली करु नये. सोलापुर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण स्वतः हा विषय मांडून याबाबत समितीस दक्ष केले असता पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मला शब्द दिला होता. आणि त्यानुसार जानेवारी महिन्यातच वीज कपात अथवा वेळप्रसंगी वीज कनेक्शन तोडण्याचा असलेला निर्णय माझ्या विरोधामुळे लांबणीवर पडला. त्याचवेळी दुष्काळजन्य परिस्थिती पाहुन जून २०२४ पर्यंत शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडायची नाहीत आणि आठ तास वीज पुरवठा करायचा असाही निर्णय जिल्हा प्रशासन आणि महावितरण यांचे कडुन एकत्रित पणे घेण्यात आला.याबाबत प्रसिद्धीकरणही देण्यात आले.
मग आज वीज कपात तरी का करत आहात ? जिल्हाधिकारी महोदयांनी एअर कंडीशन रुम मध्ये बसुन शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित असलेल्या वीजेसारख्या महत्वाच्या गरजेबाबत निर्णय घेणे चुकीचे आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन करत असताना ही वेळ येणार असल्याचे एक प्रशासक म्हणुन आपल्या लक्षात येणे गरजेचे होते. उजनीकाठची हजारो एकर शेती हा केळीचा ग्रीन झोन म्हणून भारतात अग्रेसर आहे. इथे अर्धा तास जरी जरी वीज कपात केली तरी हजारो एकर क्षेत्र वेळीच पाणी मिळण्याटासुनवंचिछ राहते. याचाहफटका पिक उत्पादनावर बसतो. तरी करोडो रुपयांच्या पिकांचे नुकसान होणार आहे. एकीकडे वाढत जाणारे तापमान पाहता केळी सारख्या पिकास आताच्या काळात पाण्याची गरज आहे. यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांचे दुखणे बांधावर येऊन जाणुन घ्यावे. आपले अधिकार शेतकऱ्यांचे माथी मारुन करमाळा तालुक्यातील केळी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करु नये. उजनीच्या पाण्यावर योग्य नियंत्रण नाही केल्याचा ठपका आपल्यावरच असुन आता धरणग्रस्त शेतकऱ्यांना आणखी संकटाच्या खाईत ढकलण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करु नये. सध्या सोलापूर जिल्ह्यात आंदोलने मोर्चे काढण्यास बंदी घालणारे आपणच आहात. पण आता लोकशाही मार्गाने जर आमच्या समर्थकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर यास कारण म्हणुन आपला चुकीचा निर्णय हेच राहील. यामुळे केवळ जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका कोणा पक्षास बसु नये. शेतीपंपाची वीज आहे तशी आठ तास कायम राहु द्यावी. आणि तशा प्रकारच्या सुचना नव्याने महावितरणला देण्यात याव्यात.अन्यथा माझे समर्थक शेतकरी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतील असा इशारा या निवेदनातुन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष