By : Polticalface Team ,29-03-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी     चालुवर्षी पाऊस खूपच कमी पडल्याने सर्वांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे . सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सुद्धा कमी पाऊस झाल्याने अर्ध्या क्षमतेपेक्षा जास्त भरले नाही . करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उजनी धरणासाठी खूप मोठा त्याग आहे . कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या तेव्हा कुठे हरित पट्टा विकसीत झालेला आहे . तालुक्यातील ३७ गावामधील शेतकरी धरणग्रस्त आहेत खरंतर त्यांचा  या पाण्यावर प्रथम हक्क आहे . एकुण ११०.८९ टीएमसी क्षमतेपैकी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हक्काचे २ टीएमसी पाणी सदैव अबाधित राहीले पाहिजे . जिल्हा प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन केले पाहिजे . मात्र प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून उजनी काठच्या गावांमधील वीज कपात करण्याबाबतच्या निर्णय झाल्याचे कळत आहे . जर या शेतकऱ्यांची वीज कपात केली तर ऊस , केळी व इतर पिके जळून खाक होतील , कोट्यावधी रुपयांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत येतील . सध्या या परिसरात ऊस पट्टयासह केळीचा पट्टा विकसीत होत आहे . येथिल केळीला जगात मागणी असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील केळी निर्यात केली जात आहे . ऊसाच्या तुलनेत केळीला चांगला भाव मिळाल्याने तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे . चालु वर्षी सुद्धा ऊस व केळी पिकांचे लागणी सह खोडवे व निडवे अशी उभी पिकं आहेत . जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याच्या पाण्यासह या परिसरातील  शेतकरी त्यांचे पशुधन व उभी पिकं पण वाचली पाहिजेत त्यासाठी आपण नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत अन् त्यांच्यावर प्रशासनाकडून  अन्याय होता कामा नये असे मत जगताप गटाचे यूवा नेते तथा भाजपा जिल्हा यूवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे . तालुक्यातील विवीध पक्षा च्या नेत्यांनी खरं तर अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही . प्रशासनाने विज कपातीचा निर्णय  घेवू नये .कमित कमी दररोज ८ तास पूर्ण दाबाने वीज पुरवावी अन्यथा जिल्हाप्रशासन व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेही ते म्हणाले .
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष