आजही 36 गावातील महत्वाचे प्रश्न सुटलेले नाही, नारायण आबांनी कुर्डूवाडी भागात संपर्क मोहीम राबवावी,,,,,,,, कार्यकर्त्यांची होत आहे मागणी
By : Polticalface Team ,30-03-2024
जेऊर प्रतिनिधी
आजही छत्तीस गावातील महत्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत, नारायण आबांनी कुर्डुवाडी भागात संपर्क मोहिम राबवावी अशी मागणी एका सुरात कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर ता.करमाळा येथे माजी आमदार नारायण (आबा) पाटील गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकांचे सत्र सुरु असुन आज माढा विभागातील कुर्डूवाडी सह छत्तीस गावांना निमंत्रीत केले होते. यावेळी बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नारायण आबा यांनी अपक्ष न उभारता कोणत्याही एका पक्षात प्रवेश करुन विधानसभेसाठी उमेदवारीचा शब्द घ्यावा. जर सध्याच्या घडामोडीत कोणत्याही पक्षाने लोकभेसाठी उमेदवारी दिली तर ती अजिबात नाकारु नये अशी भावना व्यक्त केली. तर राजाभाऊ शेंबडे यांनी आबांनी कुर्डुवाडी शहरातील ९१७ मालमत्ता धारकांचा प्रश्न सोडवला, अजून काही मालमत्ता धारकांचा प्रश्न बाकी आहे. ट्रामा केअरचे श्रेय नारायण आबा यांनाच जाते. त्यामुळे आजही जनता आबांवर विश्वास ठेऊन असल्याचे सांगितले. तसेच रोपळे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे यांनी आबांनी आमदार म्हणून दिलेल्या विकास निधीचा पाढा वाचून दाखवला. उपळवाटे येथील हर्षल वाघमारे यांनी पाटील गटाचा जो काही निर्णय असेल त्यानुसार काम करणार असल्याचे सांगितले. तर शेतकरी संघटनेचे राजाभाऊ शिंदे यांनी लोकसभेसाठी अथवा विधानसभेसाठी आबांना आमचा पाठींबा असल्याचे सांगितले.या शिवाय अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी आदिनाथ कारखाना माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक दादा पाटील, सभापती शेखर गाडे, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक, पाटील गट प्रवक्ते सुनील तळेकर, राज्य मल्लखांब असोसिएशन सचीव पांडूरंग वाघमारे, बाळासाहेब सरक आदि उपस्थित होते. प्रास्ताविक एन पी सोशल मीडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी केले तर आभार स्वीय सहायक सुर्यकांत पाटील यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी