उजनी परिसरातील शेतीपंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास, शेतकरी आक्रमक, शासनाचा केला निषेध सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील
By : Polticalface Team ,31-03-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
- करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केल्याने जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला असून त्यानी आज वांगी नं 1 येथे बैठकीत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार घोषणा बाजी करत निषेध केला व तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकार मधील पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.
दि. 26 मार्च रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यानी एका आदेशानुसार उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा आठ तासावरून सहा तास केला. त्यामुळेच उजनी जलाशय काठावरील शेतकरी आक्रमक झाला आहे. एक तर उजनी धरण यंदा केवळ 60.66 % इतकेच भरले . त्यामुळे अगदी सुरुवातीपासून उजनी धरण संघर्ष समिती पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मागणी करत होती. कालवा सल्लागार समितीने ढिसाळ नियोजन करत बेमालूम पणे पाणी सोडत राहिली. पाणी नियोजनाचा बोजवारा उडाला. उजनी जलाशय वेगाने रिता होत गेला. याच वेळेस संघर्ष समितीने उजनीच्या वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली . त्यासाठी भिगवण येथे भव्य रास्ता रोको ही केला. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यानी ही मागणी धुडकावून लावली. अशातच सोलापूर ला पिण्यासाठी नदीतून दोन वेळा पाणी सोडले. कालव्यातून गरज नसताना एकामागून दोन आवर्तन सोडली. यामुळेच आज जलाशय मायनस 37% टक्के इतका रिकामा झालाय. याला सर्वस्वी कालवा सल्लागार समिती,शासन व प्रशासन हे जबाबदार आहेत.
" चूका यांनी केल्या शिक्षा मात्र उजनी धरणग्रस्ताना " असा काहीसा प्रकार वीज कपातीमुळे झाल्याचे दिसून येत असून धरणग्रस्तांमधे प्रचंड संताप पहायला मिळत आहे.
आपली घरे,जमीनी, गाव पाण्याखाली देऊन आपल्या हक्काचं 12 टी एम सी पाणी ही उचलून न देणार्या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. वीज कपाती मुळे करमाळा तालुक्यातील जलाशय काठावरील दीड लाख हेक्टर शेती धोक्यात आली आहे. उभी पिके जळण्याची भिती व्यक्त करण्यात येत असून 65 गावातील शेतकरी,ग्रामस्थ आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार मधील पक्षांच्याविरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा सूर आज वांगी मधील बैठकीत दिसून आला.
तरीही सरकार कडे गार्हाणं मांडायचं म्हणून उध्या जिल्हाधिकारी याना भेटून वीज पूर्ववत आठ तास चालू करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी याना भेटून ही न निर्णय झाल्यास पालकमंत्री, जलसंपदामंत्री यांनाही भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.
एवढे करुन ही सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील बैठकीत मतदानावर बहिष्कार किंवा सरकार मधील घटक पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय होऊ शकतो. हे सरकार मधील पक्षांना न परवडणारी बाब ठरणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करुन सरकार ने तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करावा अशी एकमूखी मागणी करण्यात आली.
या बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर ,उपाध्यक्ष भारत साळुंके,आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे,आदिनाथ चे माजी संचालक पांडुरंग जाधव, मकाई चे संचालक युवराज रोकडे,केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव अर्जुन तकीक, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके,वांगी तीन चे सरपंच मयूर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ रोकडे ,वांगी चार भिवरवाडीचे सरपंच रामचंद्र सूळ, उपसरपंच भाऊसाहेब शेळके, नितीन तकीक, अमर आरकिले,अतुल आरकिले,राजकुमार देशमुख, तानाजी देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण केकान,धनंजय गायकवाड, दादा भोसले,पांडुरंग खरात,सचिन देशमुख, भाजपा अभियंता सेल चे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, विष्णुपंत वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे,आबा सरडे,चंद्रकांत देशमुख, लक्ष्मण मंगवडे,सुग्रीव नलवडे,गणेश पाटील,कांता खरात,प्रदीप वाघमोडे,मंगेश जगताप, भैरवनाथ जगताप इ.शेकडो नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी