करमाळा तालुक्याच्या पाणीटंचाई संदर्भात आ. संजयमामा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...बॅकवॉटर चा वीज पुरवठा 8 तास ठेवण्याबरोबरच जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची केली मागणी ...

By : Polticalface Team ,31-03-2024

करमाळा तालुक्याच्या पाणीटंचाई संदर्भात आ. संजयमामा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...बॅकवॉटर चा वीज पुरवठा 8 तास ठेवण्याबरोबरच जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची केली मागणी ...

करमाळा प्रतिनिधी

           दुष्काळामुळे पाणीटंचाईच्या तीव्र झळा सध्या करमाळा तालुक्याला जाणवू लागल्या असून या पाणी टंचाईच्या समस्येवरती मात करण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात मागणी केली आहे .सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,माझे करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे .या पाणीटंचाईच्या काळात गावोगावी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरला पाणी भरण्यासाठी पॉइंट दिलेले आहेत ,परंतु सध्या सर्वच जलस्त्रोत आटल्यामुळे सदर टँकर भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

       जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून 29 गावांसाठी पाणीपुरवठा करता येऊ शकतो, तसेच टँकरला फिडर पॉइंटही देता येऊ शकतो परंतु ही योजना नादुरुस्त असल्यामुळे लोकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांमध्ये नाराजी पसरली असून येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याची तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. तरी करमाळा मतदार संघातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जेऊर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्त होणे अपेक्षित आहे. सदर योजना सुरू करणे कामी संबंधितांना योग्य ते आदेश करणे संदर्भात सदर निवेदनात विनंती केलेली आहे.

         जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून१) जेऊर २) लव्हे ३) शेलगांव ४) वांगी नं.३५) भाळवणी ६) पांगरे ७) कविटगांव ८) बिटरगांव ९) झरे १०) कुंभेज ११) जेऊरवाडी १२) खडकेवाडी १३) पोफळज १४) कोंढेज १५) निंभोरे १६) वरकटणे १७) सरपडोह १८) गुळसडी १९) शेलगांव (क) २०) सौंदे २१) साडे २२) सालसे २३) घोटी २४) हिसरे २५) फिसरे २६) आळसुंदे २७) वरकुटे २८) नेरले २९) गौंडरे या गावांना पाणीपुरवठा होऊ शकतो.

         उजनी धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे नियोजन करताना बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा 8 तासावरून 6 तास करण्याचे धोरण प्रशासनाने जाहीर केले असून त्यानुसार अंमलबजावणी केलेली आहे, परंतु उजनी धरणाच्या पाण्यावरती धरणग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची  मागणी ही आमदार शिंदे यांनी केली आहे.


टँकर साठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव तहसीलमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवावेत...

      एखाद्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणे या धोरणात सध्या बदल झाला असून दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव  तहसीलमार्फत प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा.तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.