घोड बरोबरच कुकडीचेही आवर्तन पुन्हा पूर्ववत करा श्रीगोंदा तालुक्यातील घोड व कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी

By : Polticalface Team ,06-04-2024

घोड बरोबरच कुकडीचेही आवर्तन पुन्हा पूर्ववत करा  श्रीगोंदा तालुक्यातील घोड व कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड बरोबरच कुकडीचे ही आवर्तन पुन्हा पूर्वत करा अशी मागणी घोड व कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत वेग धरू लागले आहे. सूर्य आता मोठ्या प्रमाणावर आगवताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आहे; त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होताना दिसतो प्रसंग अवधान राखून जलसंपदा विभागाने तातडीने उन्हाळी हंगामाचे हे आवर्तन पुन्हा पूर्ववत करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागले आहे. मागील एक मार्च रोजी वेळेत आवर्तन सोडल्याने घोडच्या आवर्तनातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे उभी पिके; फळबागा ऊस शेती व जनावरांचा पाणी प्रश्न काही अंशी शितिल झाला. व काही अंशी त्याला ओलावा निर्माण झाला असल्याचे शेतकरी सांगतात. परंतु उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व मागील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता आहे; त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन जमिनीची भूक उन्हाच्या तीव्रतेमुळे मात्र तितकीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे घोड बरोबरच कुकडीचेही आवर्तन साधारणतः 15 ते 20 तारखेपर्यंत पुन्हा पूर्ववत करावेत; अन्यथा शेती पिकाची व पिण्याच्या पाण्याची मोठी दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. तत्पूर्वी जलसंपदा विभागाने शेती व शेतकरी वाचण्यासाठी उन्हाळी आवर्तन पुन्हा पूर्व करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे म्हणण्यानुसार मागील उन्हाळी घोड व कुकडीचे आवर्तन साधारणता एक मार्च रोजी सोडण्यात आले. त्यामध्ये घोडचे जवळपास 29 दिवस आवर्तन चालले. सदर घोडचे आवर्तन बंद झाले त्यापूर्वी साधारणतः 25 ते 26 टक्के धरणात पाणीसाठा होता. साधारणता आवर्तनासाठी दीड टीएमसी पाण्यातून एक आवर्तन पूर्ण होत असते अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामध्ये मृतपाणी साठापेक्षा अधिक पाणीसाठा घोड धरणात असल्याने दुसरेही आवर्तन तातडीने सोडण्यास अडचण नसावी असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दुसरी आवर्तन तातडीने सोडल्यास उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळेल आणि उन्हाळी हंगामात पाऊस पडेपर्यंत जमिनीतील पाणी तक धरेल व पिण्याच्या पाणीसाठ्यातही वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्हीही धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी; सर्वपक्षीय नेते मंडळींनी शेती व शेतकरी वाचवण्यासाठी पक्ष विरहित एकत्रित निर्णय घेऊन संबंधित जलसंपदा विभाग व कालवा सल्लागार समिती बरोबर बैठक घेऊन उन्हाळी हंगाम अत्यंत कठीण असल्याने या पाणी प्रश्नासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. कारण उन्हाची तीव्रता अत्यंत भयानक असल्याचे शेतकरी सांगतात यासाठी उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन तातडीने सोडणे तितकेच गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. या आवर्तनाबरोबरच शेतकऱ्यांना आवर्तन कालावधीमध्ये शेतीपंपाची विज खंडित न करता 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवावी कारण सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत मोठ्या प्रमाणात जाणवत असून टेंपरेचर जवळपास 40 ते 42 टक्के पर्यंत जाऊन पोहोचल्याचे सर्वांना जाणवते अशा परिस्थितीत पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे मागील आवर्तन कालावधीतील जमिनीतील ओल देखील संपुष्टात आल्याचे शेतकरी सांगतात त्यामुळे आवर्तन कालावधीत अनेक उचल पाणी धारक असल्याने या कालावधीमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता व उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही करणारा हा उन्हाळी हंगाम शारीरिकदृष्ट्या धोक्याची घंटा सांगून जात आहे त्यामुळे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सह सर्वपक्षीय नेत्यांनी देखील महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून उन्हाळी हंगामात वीजपुरवठा पूर्ववत ठेवावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी