करमाळा तालुक्यात चारा छावण्या सुरू करा, राजकारण नंतर करा- संजय घोलप
By : Polticalface Team ,07-04-2024
करमाळा प्रतिनिधी :--तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही ,चारा नाही , करमाळा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, वाडीवस्तीवर पाणी नाही आदी प्रश्न महत्वाचे असताना कोण काय वाजवतोय,कोण काय वाजवतोय हे न पाहता वरील प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिले जावेत .राजकारण काय कधीही करता येते पण या मुक्या जनावरांचा आशीर्वाद अगोदर घ्यावा नंतरच राजकारणाच्या गप्पा मारा अशी बोचरी व खरबरीत टीका मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी केली आहे .तालुक्यातील लोकांसमोर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .असे कितीतरी प्रश्न आहेत की या दोनतीन महिन्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत तालुक्यातील जनता भोळी भाबडी आहे या जनतेला कोणीही सहजा सहजी फसवून जातेय त्यामुळे आदी हे वरील महत्वाचे प्रश्न सोडवा नंतर राजकारण करा त्यातून कोण तरी येणार आहे कोण तरी पडणार आहे त्याच्याकडे न पाहता मुक्या जनावरांचा तळतळाट न घेता त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .
वाचक क्रमांक :