कुकडी  कालव्याचे  पाणी न  मिळाल्याने  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून पुन्हा शेती व पिण्याच्या पाण्यासाठीआवर्तन सोडण्याची मागणी - घनश्याम आण्णा शेलार यांचे तहसीलदारांना निवेदन                   

By : Polticalface Team ,08-04-2024

कुकडी  कालव्याचे  पाणी न  मिळाल्याने  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून पुन्हा शेती व पिण्याच्या पाण्यासाठीआवर्तन सोडण्याची मागणी - घनश्याम आण्णा शेलार यांचे तहसीलदारांना निवेदन                   

     लिंपणगाव प्रतिनिधी   कुकडी कालवा  सल्लागार  समितीची  बैठक  उपमुख्यमंत्री  नामदार  अजित  दादा  पवार  यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्याचे ठरले होते.  मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील फळबागांना पाणी न मिळताच कालवा बंद झालेला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील 80 टक्के फळबागांना उभ्या पिकांना पाणी मिळालेले नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा जळून जाणार असून, शेतकऱ्यांचे कधीही भरून  न येणारे नुकसान होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कुकडी लाभक्षेत्रातील फळबागांचे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे.  तसेच शेतकऱ्यांच्या या फळबागा वाचविण्यासाठी कुकडी धरणाचे पाणी तातडीने सोडून,  या फळबागा वाचविणे नितांत गरजेचे आहे.

               तसेच नेहमी उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी असणारे 83 स्त्रोत भरून घेतले जातात. या आवर्तनात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी थेंब रही पाणी देण्यात आलेले नाही.  त्यामुळे या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यकाळामध्ये अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार आहे.  त्यामुळे डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी घेऊन तसेच पिंपळगाव जोगे यातून येडगाव धरणात पाणी घेऊन कुकडी कालव्याची आवर्तन पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घनश्याम आण्णा शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग पुणे कार्यकारी अभियंता कुकडी क्रमांक दोन आदींना पाठवण्यात आले आहेत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष