कुकडी  कालव्याचे  पाणी न  मिळाल्याने  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून पुन्हा शेती व पिण्याच्या पाण्यासाठीआवर्तन सोडण्याची मागणी - घनश्याम आण्णा शेलार यांचे तहसीलदारांना निवेदन                   

By : Polticalface Team ,08-04-2024

कुकडी  कालव्याचे  पाणी न  मिळाल्याने  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून पुन्हा शेती व पिण्याच्या पाण्यासाठीआवर्तन सोडण्याची मागणी - घनश्याम आण्णा शेलार यांचे तहसीलदारांना निवेदन                   

     लिंपणगाव प्रतिनिधी   कुकडी कालवा  सल्लागार  समितीची  बैठक  उपमुख्यमंत्री  नामदार  अजित  दादा  पवार  यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्याचे ठरले होते.  मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील फळबागांना पाणी न मिळताच कालवा बंद झालेला असून, शेतकऱ्यांच्या शेतातील 80 टक्के फळबागांना उभ्या पिकांना पाणी मिळालेले नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा जळून जाणार असून, शेतकऱ्यांचे कधीही भरून  न येणारे नुकसान होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कुकडी लाभक्षेत्रातील फळबागांचे त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे.  तसेच शेतकऱ्यांच्या या फळबागा वाचविण्यासाठी कुकडी धरणाचे पाणी तातडीने सोडून,  या फळबागा वाचविणे नितांत गरजेचे आहे.

               तसेच नेहमी उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी असणारे 83 स्त्रोत भरून घेतले जातात. या आवर्तनात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी थेंब रही पाणी देण्यात आलेले नाही.  त्यामुळे या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यकाळामध्ये अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार आहे.  त्यामुळे डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी घेऊन तसेच पिंपळगाव जोगे यातून येडगाव धरणात पाणी घेऊन कुकडी कालव्याची आवर्तन पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घनश्याम आण्णा शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग पुणे कार्यकारी अभियंता कुकडी क्रमांक दोन आदींना पाठवण्यात आले आहेत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी