By : Polticalface Team ,14-04-2024
नागवडे कारखाना कार्यस्थळावर क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करणेत आला त्या प्रसंगी शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दोनशे पन्नास वर्षापुर्वी सर्वसामान्य समाज हा शिक्षणापासून वंचीत असल्यामुळे त्याच्याकडे ज्ञानदृष्टी नव्हती. त्यामुळे अज्ञान व अंधश्रध्देच्या विळख्यात समाज जखडलेला होता.
त्याकाळात महात्मा फुलेंनी स्वतःच्या धर्मपत्नीला शिक्षीकेची भूमिका करायला लावली व प्रचंड संघर्ष करुन सी शिक्षणाचा पाया रोवला. आज महिलांना मिळालेला सन्मान ही सावित्रीबाई फुले यांची पुण्याई आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजातील उपेक्षीत व वंचीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समपर्णीत केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाच्या वाटचालीसाठी त्यांनी लिहीलेले संविधान हा संपूर्ण भारतीयांचा जीवनग्रंथ आहे. संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळेच आज आपण स्वच्छंदी जीवन जगत आहोत. परंतु या स्वच्छंदीपणाचा काही ठिकाणी स्वैराचार होत असल्याचे पहायला मिळाते हे अतिशय दुर्दैवी आहे. महापुरुषांचे जीवनकार्य आजच्या पिढीसाठी दिपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी असुन त्यांची प्रेरणा घेवून खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीने वाटचाल करण्याची गरज आहे असे शिंदे म्हणाले.
याप्रसंगी संचालक विठ्ठलराव जंगले, चिफ इंजिनिअर डी. एम. तावरे, प्रॉडक्शन मॅनेजर एन.एम. कळमकर, शेतकी अधिकारी एस.व्ही. बागल, को-जन मॅनेजर बी.बी. नलगे, लेबर ऑफिसर बी.एम. जंगले, डिस्टी इनचार्ज आर.ए.लगड, परचेस ऑफिसर के. बी. गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यावेळी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व विभाग प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते . भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत, सुत्रसंचालन व प्रास्तावीक केले तर वसंतराव गिरमकर यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :