By : Polticalface Team ,26-04-2024
श्रीगोंदा: महापुरुषांनी समाजाला जोडायचे काम केले आहे महापुरुषांची जयंती व रमजान ईद एकत्र येणे हा तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल यांचे जयंती उत्सव सण म्हणून साजरे करावेत तरच आपापसातील भाईचारा व स्नेह वृध्दींगत होईलअसे प्रतिपादन डॉक्टर रफिक सय्यद यांनी केले . सावित्री फातिमा विचार मंच - फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांचे वतीने श्रीगोंदा येथील सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या पटांगणात आयोजित पहिली शिवजयंती साजरी करणारे स्त्री - शुद्राचे कैवारी , क्रांतीसुर्य , सत्यशोधक , राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव , भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न , डॉ बाबासाहेब आंबेडकर गुरू - शिष्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ . सय्यद बोलत होते .
विधात्याने एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून जन्मास घातले आहे . आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत . बंधू आहोत . फुले पैगंबरांचे गुणगान करतात तर पैगंबरांचे चरित्र जाणणे हे तुमचे कर्तव्य आहे . महापुरुषांची जयंती व रमजान ईद हा दुग्धशर्करा योग आहे या निमित्ताने सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हे जयंती उत्सव साजरे करावयास हवे .पारनेर येथे महापुरुषांची जयंती उत्सव व ईद मिलन कार्यक्रम एकत्रित संपन्न झाला त्याप्रमाणेच सर्वत्र साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली . कुठे आहेत त्या फातिमेच्या लेकी ? कुठे आहेत महंमद महाराज तुकोबा , अनगडशा यांचे अनुयायी ? शिवरायांनी रायगडावर मशिद बांधली ज्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते त्यांचे बांधव कुठे आहेत . त्यांना इतिहास माहित नाही , वास्तव माहित नाही ते म्हणतात देशांमध्ये जातीवाद , द्वेष , घृणा वाढत चालली आहे .याला तुम्ही कारणीभूत आहात असे सांगत डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले फुलेंनी पैगंबरांवर जो पोवाडा लिहिला आहे तो तुम्ही समजावून सांगणे गरजेचे होते .
*कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास जात प्रमादास गोडी गोडी*
*गाढिला अधर्म सर्वात अभेद ठाम केला*
म्हणजेच पैगंबरांनी अभेद ठाम केला आणि तुम्ही येत नाही , भेद करता असे सांगत मुस्लिम समाजाच्या तरुणांनीही अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्याची व सत्य माहित करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले .
ते पुढे म्हणाले इस्लामची शिकवण ही नाही पैगंबर म्हणतात तो मुस्लिमच नाही जो पोट भरून खाईल मात्र त्याचा शेजारी उपाशी राहील . भले तो कोणीही असो .तुमच्या वागण्यात पैगंबर कोठे आहेत . सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी पैगंबर यांनी स्त्री उद्धारासाठी महान कार्य केले आहे .त्याकाळी मुलींना जिवंत जाळण्याची प्रथा होती ती बंद केली . लोकांना सत्य ते सांगितले . त्यानंतर मुलगी जन्माला आल्यावर माय-बाप दिवाळी साजरी करू लागले . ज्या प्रमाणे नमाज , रोजा सक्तीचे आहे त्याप्रमाणेच शिक्षण देखील सक्तीचे केले . त्याचे महत्त्व पटवून दिले . ज्यांनी आपल्या मुलींना शिकवले , वाढवले व योग्य वयात आल्यानंतर तिचे योग्य वराशी लग्न लावून दिले त्यांच्या स्वर्गाची मी हमी घेतो असा पैगंबरांनी वादा केला आहे . महिलांना संपत्तीत वारसा हक्क दिला , तिच्या संमतीशिवाय विवाह होणार नाही हा कायदा बनवला , तलाक चा अधिकार दिला . आईच्या पायाखाली स्वर्ग आहे हा सन्मान स्री ला दिला . ज्योतीरावांनी पैगंबरांवर उगाच नाही जहाँमर्द महंमद हा पोवाडा लिहिला . महापुरुषांनी जोडायचे काम केले आहे आता तरी एकत्र या . दिवसेंदिवस परिस्थितीत बदल होत आहे एकोप्याची गरज आहे . आदेशा अनुसार संघटना , एकोप्याशिवाय तुम्ही मुस्लिमच नाही अशी तंबी देण्यासही ते विसरले नाहीत . तर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व पाथरी येथील प्राध्यापक आर आर यादव यांनी संत कबीर , रविदास , नामदेव ,चोखा ,गोरा , सावता , सेना , नरहरी हे सर्व समतेला मानणारे संत असल्याचे सांगून ज्योती रावांनी शिवाजी महाराजांचा इतिहास शोधून लिहिला ज्योतिरावांनीशिवराय ही दिले . शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले .सबाजीराव गायकवाड यांनी मदत केली . यांचा काय संबंध होता ? शाहू राजांनी तर आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी जाताना आमच्या बहिणीला माहेरी पाठवा असे देखील सांगीतले याचा अर्थ काय ? तर या सर्वच महापुरुषांचे फार मोठे योगदान आहे , आपल्यावर मोठे उपकार आहेत
गाडगेबाबा यांच्याबाबत सांगताना ते म्हणाले आपल्या मुलाच्या निधनाने जेव्हढे खचले नाहीत तेव्हढे दुःख बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेंव्हा गाडगे बाबांना झाले . त्यानंतर अवघ्या 14 दिवसातच त्यांचेही आयुष्य संपले हा आपले पणाचा इतिहास आहे . त्याप्रमाणेच अण्णाभाऊ साठे रशियात जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा गातात त्यामुळेच म्हटले आहे ते नव्हते एका जातीचे मात्र होते एका मतीचे एका नितीचे भूमिपुत्र एका मातीचे . या महापुरुषांचा इतिहास आपण जपला पाहिजे समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि न्याय या चतु:सूत्री वर आधारित नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी शिकलेल्या लोकांनी पहेल केली पाहिजे , यासाठी काम केले पाहिजे तरच महापुरुषांची जयंती आपण साजरी केली असे म्हणता येईल . असा उपदेश यादव सरांनी उपस्थितांना केला . महामानवांच्या जयंती साठी सातत्याने पुढाकार घेणारे ऍड . संभाजी बोरुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्योतिराव फुले , अण्णाभाऊ साठे , बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांवर प्रकाशित पुस्तकांचे उपस्थितांना वितरण केले .कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष