भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी करमाळ्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांची वज्रमुठ येत्या दोन दिवसांत भव्य मेळाव्याची घोषणा

By : Polticalface Team ,28-04-2024

भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी करमाळ्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांची वज्रमुठ येत्या दोन दिवसांत भव्य मेळाव्याची घोषणा   करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी करमाळा तालुक्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. करमाळा येथील हॉटेल राजयोग येथे समविचारी इंडिया आघाडीच्या घटकपक्ष नेत्यांची बैठक संपन्न झाली .यामध्ये करमाळा तालुक्यातील प्रा .रामदास झोळसर, कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेस आॕयचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, सुजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ॲड सविता शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, ,शिवसेना ठाकरे गटाचे नेते शहराध्यक्ष संजय शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी विरुधात एकत्र येऊन माढा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगणार आहोत.भाजपची हुकुमशाही देशांमध्ये वाढत चालली आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून शेतकरी मजूर घटकांना वंचित ठेवण्याचे काम भाजपने करून भांडवलशाहीची निर्मिती केली आहे ‌ . सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन आपल्या पक्षाचे हित जपण्याशिवाय सामान्य जनतेकडे बघण्यास हे सरकार तयार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून सध्या सक्षम पर्याय म्हणून काम करणार आहोत. भारतात बेरोजगारी शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे.गरीबांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. भाजप हुकुमशाही करत आहे . विरोधी पक्ष ठेवायाचा नाही घटकपक्षाची तोडमोड करून धमकी देऊन ईडीच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा काम करत आहेत. यावेळी प्रा रामदास झोळसर म्हणाले की मराठा.धनगर, मुस्लिम आरक्षणिविषयी सरकारने फक्त दिशाभूल करून समाजाला फसवण्याचे काम केले आहे.त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी इंडिया आघाडीची गरज आहे त्याकरिता जास्तीत जास्त मतदान करून घेणे आवश्यक आहे.करमाळा तालुक्यामध्ये शेतकरी यांची ऊसाची बिले न देणारे त्यांचे नावावर कर्ज काढणारे सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्यांना साखर कारखानदारांना लबाड पुढारी लोकांना बळ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी जनतेने उभा राहणे गरजेचे आहे.त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेला इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगण्यासाठी येत्या दोन तीन दिवसात भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी