By : Polticalface Team ,15-05-2024
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी१३ मे रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान अवकाळी व गारांचा पाऊस पडल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने वाढलेला ऊस व हाता तोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी सायंकाळी अचानक ढग जमा होऊन सुसाट वारा वेगाने वाहू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला कांदा झाकण्यासाठी कांदा उत्पादकांची मोठी त्रिधातिरपट उडाली; तर अनेक शेतकऱ्यांचा सात ते आठ महिने वाढलेला ऊस या वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येण्यासारखे नुकसान झाले. सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत भयंकर असून सूर्य मोठ्या प्रमाणात आग उत्पन्न दिसत आहे. या अतिउष्णतेमुळे आहे; त्या पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील अत्यंत गंभीर बनला गेला आहे. दरम्यान चालू वर्षी उन्हाळी हंगाम मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने साधारणता ९.३० ते सायंकाळी 5:30 पर्यंत जवळपास तापमान 40 अंशाच्या पुढे कायम राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उन्हाळी हंगाम अबाल वृद्धांसह सर्वांनाच मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचा जाणवत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी वादळी वाऱ्या बरोबर बरसत असल्याने सायंकाळी गारवा निर्माण होताना जाणवतो. परंतु पुन्हा सकाळी उष्णतेची लाट तयार होऊन सर्वत्र गरमागरम वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस हा अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्रासदायक समजला जातो. दिवसभर कांदा उत्पादक कांद्याच्या वखारी उघडा ठेवतात. अशावेळी मात्र अवकाळी पाऊस अचानक चक्रीवादळ घेऊनच येतो आणि कांदा उत्पादक व शेतकऱ्यांची धांदल ओढून देतो. श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परंतु हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या दुःखात भर घालणारा असल्याने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्ये लिंबू; आंबा इत्यादी फळझाडांचे मोठे नुकसान होताना दिसते. दोन दिवसापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुका कृषी विभागाने तालुक्यातील प्रत्येक गावातील फळबागा व उभ्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसते. कारण शेतकरी मोठ्या संकटातून शेती पिकाचे रक्षण करत आहे. एकीकडे शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या धर्म संकटात आहे.
तालुक्यातील वांगदरी येथे सोमवारी 13 मे रोजी सायंकाळी झालेला अवकाळी गारांचा पाऊस व वाऱ्यामुळे विजेचे खांब व तारा तुटल्यामुळे गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून; मोठ्या प्रमाणात झाडे देखील जमीन दोस्त झालेले आहेत. त्यामुळे येथील दळणवळण व्यवस्था कोलमडली गेल्याचे केल्याचे समजते. दरम्यान तेरा मे रोजी लोकसभा निवडणुक पार पडली. सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर मत पेट्या जमा करताना मतदान कर्मचाऱ्यांना देखील या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा काही त्रास सहन करावा लागला तशा भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष