गोयेगाव ते आगोती दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By : Polticalface Team ,02-06-2024

गोयेगाव ते आगोती दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी


प्रतिनिधी करमाळा

इंदापूर व करमाळा  तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 

आगोती (ता.इंदापूर )ते गोयेगाव (ता. करमाळा) दरम्यान नवीन पूलाची मंजुरी द्यावी व मंजूर असलेल्या कुगाव शिरसोडी पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे 

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गणेश कराड यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे. 


दिलेल्या निवेदनात कराड यांनी म्हटले आहे की करमाळा व इंदापूर तालु्यातील नागरीकांना हाकेच्या अंतरावरील असलेल्या गावात जाण्यासाठी  भिगवण टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्याच्या मार्गे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो.त्यामुळे पैसे व वेळेची बचत करण्यासाठी उजनी जलाशयातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी,डाळींब,ऊस व इतर फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा परिसर फृट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात कृषि पर्यटन, मासेमारी,साखर उद्योग, वनस्पती अभ्यास,नौकाविहार, जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी कुगाव ते शिरसोडी तसेच गोयेगाव (वाशिंबे )ते आगोती दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे.उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते आगोती नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सद्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे.आगोती ते गोयेगाव भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध आहेत.त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुकडुन तीनशे तीनशे मीटर पर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल. 


इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव(वाशिंबे)असा पूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार आहे.करमाळा तालुक्यातील पोफळज ते टाकळी दरम्यानचे सर्वांना दळणवळणासाठी सोईस्कर होणारें मध्यवर्ती असे गोयेगाव (वाशिंबे)हे ठिकाण आहे उजनी पाणलोट क्षेत्रात या पूलामुळे सकारात्मक परिणाम होणार आहे.या पूलासाठी पश्चिम भागातील बहुतांश ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे मागणी केली आहे


श्रीकांत साखरे 

सामाजिक कार्यकर्ते, राजुरी.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी