कुकडी डाव्या कालव्याचे चालू आवर्तनामधून पिण्यासाठी विसापूर करण्यात पाणी सोडण्याची मागणी राजेंद्र दादा नागवडे यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
By : Polticalface Team ,10-06-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)--श्रीगोंदा तालुक्यात तसेच कुकडी लाभ क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात परंतु बऱ्यापैकी पाऊस झाला ;त्यामुळे सध्या कुकडी डाव्या कालव्याचे पिण्याकरिता चालू असलेल्या आवर्तनामधून विसापूर धरणात पाणी सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केली आहे.
या निवेदनात श्री नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की; मागील काही दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यात व विशेषता कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात पिण्याचे पाण्याची तीव्रतां निर्माण झाल्यामुळे कुकडी डाव्या कालव्यातून पिण्याकरिता पाणी सोडण्यासाठी मागणी करण्यात आली होती. व त्यानुसार पाण्याचे उद्भव भरून घेणे करता पाणी सोडण्यात आलेले आहे. परंतु सध्या श्रीगोंदा तालुक्यात तसेच कुकडी कालवा लाभ क्षेत्रात असणाऱ्या कर्जत; करमाळा; जामखेड या भागातही कमी अधिक प्रमाणात परंतु बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. शिवाय मान्सूनचे आगमन होत असल्यामुळे चांगल्या प्रकारे पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या कुकडी डाव्या कालव्यातून सोडलेल्या पिण्याचे पाण्याचे आवर्तनामधून श्रीगोंदा तालुक्यात साठवण तलाव भरून घेण्यात यावेत; व त्याचबरोबर विसापूर धरणात पाणी सोडून ते भरून घेतले तर त्याचा कुकडी व विसापूर लाभ क्षेत्र
वाचक क्रमांक :