आशेचा किरण सत्यात उतरला; अखेर संघर्षमय जीवनाला मिळाला न्याय, छत्रपती कॉलेजमधील विद्यार्थिनीचे पोलीस भरतीत यश

By : Polticalface Team ,15-07-2024

आशेचा किरण सत्यात उतरला; अखेर संघर्षमय जीवनाला मिळाला न्याय, छत्रपती कॉलेजमधील विद्यार्थिनीचे पोलीस भरतीत यश लिंपणगाव प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत पोलीस भरतीपूर्व व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून १२ जुलै २०२४ रोजी निवड झालेल्या यादी मध्ये आशा शामराव अस्वर, रा- गणपती मळा, श्रीगोदा या प्रशिक्षणार्थी मीरा भाईंदर पोलीस भरती मध्ये निवड झाली. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण बद्दल त्यांना दोन वर्षांपूर्वी माहिती मिळाली आणि प्रशिक्षण सुरू झाले. बिकट आर्थिक परिस्थीतीमुळे १२ वी नंतर शिक्षण सुटले, घरच्यांनी लग्न लावून दिले, सासरची आर्थिक स्थितीही जेमतेम, मोठा मुलगा इ. सातवीत, मुलगी इ. पाचवीत, खांद्यावरती प्रपंचाची जबाबदारी आणि पोलीस भरतीची वयाची मर्यादा संपत आलेली. सासरच्या मंडळींनी प्रोत्साहन दिले आणि आशाताईनी प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि यश संपादित केले. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते आशाचा आणि तिच्या घरातील सर्व मंडळींचा कॉलेजवर सन्मान केला. दादांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुभाष काका शिंदे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. तिने मनोगत व्यक्त करताना दिनक्रम नमूद केला. पहाटे ४ वाजता दिनक्रम सुरू व्हायचा. घरची आणि जनावरांची कामे आवरून छत्रपती कॉलेज वर सकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत ग्राउंडवर सराव करायचा. परत घरी जाऊन स्वयंपाक आणि शेतीची कामे करून छत्रपती कॉलेजवर सायंकाळी ४ वाजता लेक्चर करायचे. परत घरी जाऊन संध्याकाळी आवरायचं आणि जेवण झाल्यानंतर अभ्यास करायचा. मागील वर्षी अवघ्या ४ मार्कने हुलकावणी दिली आणि पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली आणि शेवटी यादीत पहिल्या नंबरला नाव आले. तिने या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे,सर्व विश्वस्त, प्राचार्य आणि कॉलेजमधील मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. शिवाजीराव नागवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने १९८२ साली महाविद्यालय सुरू केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ९९ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले महाविद्यालयात आज ३८२७ विदयार्थी अध्यापन करत आहे.१६ एकर भौतिक सुविधा असलेला सुंदर परिसर आहे. सुसज्य ४०० मी. ट्रॅक आणि अभ्यासिका आहे. बापूंच्या संस्कारात वाढलेले राजेंद्रदादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची उत्तम प्रगती सुरू आहे. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देऊन अनेक कौशल्य विद्यार्थी आत्मसात करत आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत असून विद्यार्थ्याना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे महाविद्यालयाची यशोगाथा राज्य पातळीवर पोहचली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच या विभागाचे संचालक यांनी यापूर्वी महाविद्यालयाचा सन्मान केलेला आहे. "स्व.बापूंनी बिकट परिस्थितीत या संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी जीवाचे रान केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही सर्वजण करत असताना, कॉलेजचा विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे, म्हणून कॉलेजमध्ये सुसज्य अशा सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत" असे मत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी व्यक्त केले. या करता प्रा.सतीश चोरमले, प्रा.वैभव सोनवणे, श्री किरण बंड, प्रा.विवेक शेलार, दर्शन आल्हाट, घोडके सर, प्रा.महेश गिरमकर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच करिअर कट्टा समन्वयक प्रा. विलास सुद्रिक व डॉ. विजय इथापे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ.अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्त, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी