श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी ते विसापूर या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे. निंबवी , कोरेगव्हान व कोंडेगव्हान या तीनही गावातील लोकांना शाळा , कॉलेज व दवाखाना इ. कारणास्तव पिंपळगाव येथे जावे लागते. परंतु या रस्त्यात इतके खड्डे पडलेत की , *रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता* असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.या रस्त्याचे काम साधारणपणे 15 ते 20 वर्षांपूर्वी झालेले असावे , हा रस्ता इतका खराब झाला आहे की या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही होत असतात.या रस्त्यावर वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.हा रस्ता ढवळगावकडून निंबवीच्या शिवेपर्यंत चांगला झाला आहे, परंतु निंबवी ते पिंपळगाव पर्यंत हा रस्ता का थांबलाय हे मात्र कळायला मार्ग नाही. श्रोगोंदयाचे माजी आमदार हे पिंपळगावचे असल्याने मुद्दाम त्यांच्या गावाच्या आजूबाजूचे रस्त्यांची कामे ठेवली आहेत , अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा रस्ता व्हावा अशी या गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.रस्ता न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा *निंबवी गावचे युवा सरपंच श्री.काकासाहेब शिर्के* आणि *शरदचंद्र पवार साहेब गटाचे पुणे नगर जिल्ह्याचे सोशियल मीडिया प्रमुख मा रविभाऊ शिरसाठ यांनी दिला आहे*
वाचक क्रमांक :