By : Polticalface Team ,23-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात गुरुपौर्णिमा सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. प्रामुख्याने तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक विद्यालय व महाविद्यालय मध्ये देखील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेचे महत्त्व या विषयावर संभोधित करण्यासाठी सर्वांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रोत्साहित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आनंद पुराणे सर हे होते. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुवर्य साक्षी परब्रह्म भविष्यात जीवन आनंदी व उत्साही वातावरणात जगण्यासाठी व जीवनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे हे महत्त्वाचे ठरते. गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो त्या ठिकाणी स्वतःचे कर्तुत्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक म्हणून गुरुची आज्ञा ही महत्त्वाची असते. त्यानुसारच आपणाला जीवनाची दिशा समजते. प्रामुख्याने विद्यालयाचे विद्यार्थी कुमारी योगिता जठार; सृष्टी लगड; कार्तिक काकडे; प्रांजल उंडे; गीतांजली कापसे; यश डांगे; स्नेहल गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचे महत्व भावनिक दृष्ट्या व्यक्त करत आपल्या गुरुजनांना वंदन केले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य आनंद पुराने सर यावेळी बोलताना म्हणाले की; विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात भरपूर ज्ञान मिळून अडचणी प्रसंगी आपल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यावे ज्ञानदान करत असताना शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी; वेळोवेळी उज्वल यश संपादन करावे ही अपेक्षा असते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शिक्षकांची आज्ञा अंगी बाळगावी असे सांगून गुरु प्रत्येकाला गुरु असणे महत्त्वाचे असल्याचे प्राचार्य पुराने यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा खांडेकर हिने केले. आभार कुमारी सानिका जाधव या विद्यार्थिनीने मानले.