श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

By : Polticalface Team ,25-08-2024

श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

नंदकुमार कुरुमकर -लिंपणगाव (प्रतिनिधी)- गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामध्ये दररोज पावसाच्या सरी बरसल्या जात आहेत. त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यसह खरिपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून खरीप हंगामाच्या उत्पन्नाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही. त्यामुळे खरिपाची हातातोंडाशी आलेले पिके या अतिवृष्टीमुळे भुईसपाट होतात की काय? अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. दरम्यान चालू वर्षी पाऊस वेळेत सुरू झाला; शेतकऱ्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या. परंतु पावसाने सध्या दुर्वाधार हजेरी लावल्याने खरिपाची पिके अनुक्रमे बाजरी; कपाशी; उडीद; तुर उत्पन्नाची मका इत्यादी पिके या अतिपावसामुळे हातची जातात की काय? त्यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी वेळेत पावसामुळे खरिपाची पिके जोमात होते. परंतु सततच्या पावसाने काटनीला आलेली बाजरी अक्षरशा भोईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. तर कपाशीची पाने पिवळी पडले आहेत. कपाशीच्या पाकळ्या ही गळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे चालू वर्षी जोमात आलेल्या या खरिपाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळण्याची घोर निराशा शेतकऱ्यांना होताना दिसते. 

        दरम्यान या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी या खरिपाच्या पिकांचे एक रुपया प्रमाणे पिक विमा भरले. नुकसान झालेल्या शेती पिकाचे अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आमच्या खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत; अशा विनवण्या केल्या. परंतु कृषी विभागाकडून मात्र पंतप्रधान कृषी विमा फ्री टोल क्रमांक 14 447 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगितले जाते. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी विमा कार्यालयाशी संपर्क साधला असता या सर्व लाईन्स व्यस्त असल्याचे शेतकऱ्यां कडून समजते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन उचलले जातात व त्यांच्याकडून राज्य; जिल्हा व तालुका आणि गाव इत्यादींची माहिती घेतली जात आहे. परंतु पुढे या नुकसानीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे खरीप पिकांचे पंतप्रधान कृषी विमा उतरून देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नसल्याने शेतकऱ्यांमधून या पंतप्रधान कृषी विमाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक