श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

By : Polticalface Team ,25-08-2024

श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

नंदकुमार कुरुमकर -लिंपणगाव (प्रतिनिधी)- गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामध्ये दररोज पावसाच्या सरी बरसल्या जात आहेत. त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यसह खरिपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून खरीप हंगामाच्या उत्पन्नाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही. त्यामुळे खरिपाची हातातोंडाशी आलेले पिके या अतिवृष्टीमुळे भुईसपाट होतात की काय? अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. दरम्यान चालू वर्षी पाऊस वेळेत सुरू झाला; शेतकऱ्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या. परंतु पावसाने सध्या दुर्वाधार हजेरी लावल्याने खरिपाची पिके अनुक्रमे बाजरी; कपाशी; उडीद; तुर उत्पन्नाची मका इत्यादी पिके या अतिपावसामुळे हातची जातात की काय? त्यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी वेळेत पावसामुळे खरिपाची पिके जोमात होते. परंतु सततच्या पावसाने काटनीला आलेली बाजरी अक्षरशा भोईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. तर कपाशीची पाने पिवळी पडले आहेत. कपाशीच्या पाकळ्या ही गळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे चालू वर्षी जोमात आलेल्या या खरिपाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळण्याची घोर निराशा शेतकऱ्यांना होताना दिसते. 

        दरम्यान या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी या खरिपाच्या पिकांचे एक रुपया प्रमाणे पिक विमा भरले. नुकसान झालेल्या शेती पिकाचे अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आमच्या खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत; अशा विनवण्या केल्या. परंतु कृषी विभागाकडून मात्र पंतप्रधान कृषी विमा फ्री टोल क्रमांक 14 447 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगितले जाते. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी विमा कार्यालयाशी संपर्क साधला असता या सर्व लाईन्स व्यस्त असल्याचे शेतकऱ्यां कडून समजते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन उचलले जातात व त्यांच्याकडून राज्य; जिल्हा व तालुका आणि गाव इत्यादींची माहिती घेतली जात आहे. परंतु पुढे या नुकसानीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे खरीप पिकांचे पंतप्रधान कृषी विमा उतरून देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नसल्याने शेतकऱ्यांमधून या पंतप्रधान कृषी विमाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते