श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

By : Polticalface Team ,25-08-2024

श्रीगोंदा तालुक्यात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी कायम; अति पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात?

नंदकुमार कुरुमकर -लिंपणगाव (प्रतिनिधी)- गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामध्ये दररोज पावसाच्या सरी बरसल्या जात आहेत. त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यसह खरिपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून खरीप हंगामाच्या उत्पन्नाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही. त्यामुळे खरिपाची हातातोंडाशी आलेले पिके या अतिवृष्टीमुळे भुईसपाट होतात की काय? अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. दरम्यान चालू वर्षी पाऊस वेळेत सुरू झाला; शेतकऱ्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या. परंतु पावसाने सध्या दुर्वाधार हजेरी लावल्याने खरिपाची पिके अनुक्रमे बाजरी; कपाशी; उडीद; तुर उत्पन्नाची मका इत्यादी पिके या अतिपावसामुळे हातची जातात की काय? त्यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी वेळेत पावसामुळे खरिपाची पिके जोमात होते. परंतु सततच्या पावसाने काटनीला आलेली बाजरी अक्षरशा भोईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. तर कपाशीची पाने पिवळी पडले आहेत. कपाशीच्या पाकळ्या ही गळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे चालू वर्षी जोमात आलेल्या या खरिपाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळण्याची घोर निराशा शेतकऱ्यांना होताना दिसते. 

        दरम्यान या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांनी या खरिपाच्या पिकांचे एक रुपया प्रमाणे पिक विमा भरले. नुकसान झालेल्या शेती पिकाचे अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आमच्या खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत; अशा विनवण्या केल्या. परंतु कृषी विभागाकडून मात्र पंतप्रधान कृषी विमा फ्री टोल क्रमांक 14 447 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगितले जाते. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी विमा कार्यालयाशी संपर्क साधला असता या सर्व लाईन्स व्यस्त असल्याचे शेतकऱ्यां कडून समजते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन उचलले जातात व त्यांच्याकडून राज्य; जिल्हा व तालुका आणि गाव इत्यादींची माहिती घेतली जात आहे. परंतु पुढे या नुकसानीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे खरीप पिकांचे पंतप्रधान कृषी विमा उतरून देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नसल्याने शेतकऱ्यांमधून या पंतप्रधान कृषी विमाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी