ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते
By : Polticalface Team ,13-09-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी) -श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील असणाऱ्या खेड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत आता पाठिमागे नाहीत; असे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन तथा कुकडी घोड कालवा सल्लागार समितीचे सदस्य तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी केले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील गणेशा आनंदवाडी येथील कु. विद्या शिवाजी कोल्हटकर हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित करून वैधमापनशास्त्र क्लास २ पदी निवड झाल्याबद्दल नवभारत माध्यमिक विद्यालय गणेशा आनंदवाडी येथे सत्कार प्रसंगी बोलताना पाचपुते यांनी बोलताना सांगितले.
पाचपुते यांनी पुढे सांगितले की या भागातील पुढिल शिक्षण घेण्यासाठी दूर जावे लागत होते. त्यातच काही पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेण्याची इच्छा असताना सुद्धा शिक्षण घेता येत नव्हते; त्यामुळे याठिकाणी माध्यमिक शाळा उघडली याच शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च पदावरती स्थानापन्न झाले आहेत. याचा आज अभिमान वाटतो असे पाचपुते यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष ॲड.प्रतापराव पाचपुते, भास्कर जगताप, संस्था सचिव संभाजी कोकाटे, संस्था विश्वस्त रत्नमाला पाचपुते, अशोकराव भोसले,यशवंत शेजुळ, गणेश सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी कोल्हटकर मुख्याध्यापक सुनिल गिरमकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :