By : Polticalface Team ,19-09-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :
मागील काही दिवसांपासून एनडीए सरकारच्या नेत्यांकडून देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शरीराला इजा पोहोचविण्याच्या दृष्टीने विधाने येत आहेत.केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि युपी मधील योगी सरकारचे मंत्री रघुराज सिंग यांनी राहुल गांधी यांना आतंकवादी म्हणून संबोधले तसेच दिल्ली भाजपचे नेते तरविंदरसिंह मारवाह यांनी राहुल गांधी यांना इंदिरा गांधींची जशी अवस्था झाली तशी तुमची अवस्था होईल ही धमकी दिली.महाराष्ट्रातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राजकारणाच्या पातळीचा स्तर सोडत राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यासाठी अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केले तर विदर्भातील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या जीभेला चटके देण्याची आक्षेपार्ह भाषा वापरली.आज दिनांक १९ सप्टेंबर दिवशी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासमोर एनडीए सरकारच्या नेत्यांविरोधात तक्रार देण्यात आली.एसपी ऑफिस मध्ये सदरील निवेदन पडताळणीसाठी पाठवतो हा शेरा पोलिस निरीक्षक यांनी दिला आहे.राहुल गांधी यांचा अपमान कसाच सहन करणार नाही ही काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची भावना आहे.देशाचे विरोधीपक्षनेते असणाऱ्या राहुल गांधी यांचा अवमान हा देशातील प्रत्येक माणसाचा अवमान आहे ही काँग्रेसची धारणा आहे.राहुल गांधी यांची जनमानसात मिसळून काम करण्याची पद्धत आणि वाढत असलेली प्रसिद्धी एनडीए सरकारच्या नेत्यांना सहन होत नसल्याने ते गरळ ओकत आहेत.
या निषेध आंदोलनासाठी आणि तक्रार देण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितलभैया वाबळे, शहराध्यक्ष मनोहर पोटे, मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब शेलार, जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय आनंदकर, कांतिलाल कोकाटे, मुकुंद सोनटक्के,शिवाजी घोडके, योगेश मांडे, भूषण शेळके, विनोद झेंडे, अजीम जकाते, आदेश झराड, संजय कुटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :