लिंपणगाव (प्रतिनिधी नंदकुमार कुरूमकर )- तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनंतर श्रीगोंदा तालुक्यात आई जगदंबा माता; आईतुळजाभवानी माता; दुर्गामाता; अंबिका माता; रेणुका माता इत्यादी दैवी शक्तींचा जागर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गावोगावी जे दैवी शक्तीची मंदिरे आहेत; ती मंदिरे आता आकर्षक विद्युत रोषणाईने मन हे लावून टाकताना दिसत आहेत. त्यामध्ये सायंकाळी आराधी मंडळींची मैफल; दैवी शक्ती वर आधारित गाण्यांचा सिलसिलाट त्यामुळे नऊ दिवस धार्मिक सांस्कृतिक गाण्यांद्वारे उत्तम प्रकारे प्रबोधन होताना दिसत आहे. घटस्थापना ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिसऱ्या शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे घटस्थापना गेल्या आठ दिवसापासून आई जगदंबा मातेच्या स्वागतासाठी घरांची स्वच्छता; अंगणातील सडा; रांगोळ्या याबरोबरच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन संकल्प त्यामध्ये वाहन खरेदी; ट्रॅक्टर; मोटरसायकल खरेदी अशा अनेक वस्तू जीवनाला संजीवनी ठरणाऱ्या त्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी खरेदी केल्या चे दिसून आले. निश्चितच घटस्थापनेचा दिवस हा शुभ दिवस समजला जातो. त्यादिवशी आई जगदंबा माता अदृश्य शक्ती द्वारे प्रत्येकाच्या घराघरांमध्ये प्रवेश करते असे जुने जाणकार ज्योतिष्य सांगतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीत घटस्थापना हा अत्यंत पवित्र शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या नवरात्र उत्सवांमध्ये प्रत्येक जण आपल्या घरामध्ये पावित्र्याचे पालन करताना दिसत आहेत. त्यामध्ये श्रीगोंदा तालुका हा संत शेख महंमद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत पवित्र असा तालुका समजला जातो. या तालुक्यांमध्ये धार्मिक उत्सव अत्यंत गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. प्रामुख्याने तालुक्यातील साळवण देवी आणि श्रीगोंद्यातील रेणुका माता मंदिर वांगदरीचे अंबिका माता हे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरांमध्ये पार पडतात. अनेक भाविक भक्त या दैवी शक्तींना कौटुंबिक समस्या दूर होण्यासाठी साकडे घालतात. नवसाला पावणारे या शक्ती असल्याने निश्चितपणे या दैवी शक्तीवर भक्तांच्या अपार श्रद्धा दिसून येत आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे दूर होतात. असे भक्तगण सांगतात. त्यामुळे घटस्थापना म्हटले की; अंबिका माता; रेणुका माता; दुर्गामाता; तुळजाभवानी माता इत्यादी मंदिरांमध्ये रात्रभर आराधी मंडळी यांच्या समवेत ग्रामस्थ महिला मोठा जागर करतात. त्यातून निश्चितपणे एक प्रकारे भक्तीमय वातावरण नऊ दिवस तयार होत असते. या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रत्येक धर्मांमध्ये सामाजिक सलोखा; बंधुत्व आणि एक आपुलकीचे नाते अधिक दृढ होताना दिसते. त्याचे देखील तंतोतंत पालन करण्यात येत आहे. दरम्यान लिंपणगाव येथे तर तरुण कार्यकर्त्यांनी लिंपणगाव मुंढेकरवाडी रोड लगत असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या कलश रोहन करण्याचा संकल्प घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर घेतला. यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात भक्तगण आर्थिक हातभार लावून सहभागी होत आहेत. त्यामध्ये गावातील तरुण कार्यकर्ते; सप्ताह मंडळ यांच्याकडून जास्तीत जास्त वर्गणी गोळा करून या तुळजाभवानी मातेच्या आकर्षक अशा कलशरोहणाचा निर्णय घेतला आहे. गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुण वर्ग अग्रेसर असतो. यापूर्वी गावातील दुर्लक्षित मंदिराचा देखील या तरुणांनी उत्तम प्रकारे लोकसभागातून जीर्णोद्धार केला तो अत्यंत प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घटस्थापने निमित्त संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात एक प्रकारे भक्तीने वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे.
वाचक क्रमांक :