साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शरद पवार राहूल गांधी मैदानात

By : Polticalface Team ,04-10-2024

साखरपट्टा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शरद पवार राहूल गांधी मैदानात

जनआधार न्युज भिमसेन जाधव

लोकसभा निवडणूकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महाविकास आगाडीने कंबर कसली आहे. यासाठी मविआने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक महत्व दिले आहे. तर आता शरद पवार साखर पट्ट्यात आपले दौरे आखत आहेत. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून महायुतीला जिंकण्याचा कानमंत्र देत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश आणि राहूल गांधी यांचा कोल्हापूर दौऱ्याने सर्वांचे लक्ष राजकीय घडामोंडीकडे वेधले आहे.

लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात सत्ता आणण्यासाठी महाविकास आगाडीने कंबर कसली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील शेतीच्या प्रश्नासह विविध नेत्याच्या नाराजीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या राज्याच्या विविध भागात नाराजांसह दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधत आहेत. तर परत एकदा साखर पट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राकडे पावले टाकत आहेत. मात्र शरद पवार यांच्यासह मविआच्या नेत्यांना येथे टक्कर देण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील साखर पट्ट्यात उतरले आहेत. गेल्या ते सतत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून कोल्हापूरमध्ये विशेषत: येत आहेत. तसेच केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडीक खासदार उदयराजे भोसले यांच्यासह भाजपचे नेते आपली तादक येथे वाढण्यावर भर देत आहेत.

असे असले तरिही सहा जिल्ह्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची पाळेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस घट्ट झाली आहेत. यामुळेच भाजपने धनंजय महाडीक उदयराजे भोसले यांच्यासह बड्या नेत्यांना फोडले. जे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी होते. याच्याबरोबर अनेक दुसरे नेते देखील सध्या भाजपात गेले आहेत. जे मुळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे आहेत. आता राजकीय वारे फिरले असून पुन्हा एकदा शरद पवार यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे. साखर पट्ट्यात अनेक बडे नेते शरद पवार यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संपर्कात आहेत. तर दिल्लीवारीकरून काही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे असल्याने अनेकांचा प्रवेश रखडलेला आहे.

आता विधानसभा काबीज करण्याचेच असे एकच लक्ष मविआच्या समोर असल्याने भाजपला कोंडीत पाडणाऱ्या नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जात आहे. यात भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला हात दिला आहे. सोलापूरातही मोहीते-पाटलांनी देखील भाजपला रामराम करत तुतारी फुंकली. त्यातच आता महाराष्ट्रातला अख्खा बीएसआर पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार आहे. यामुळे आपला गड अधिक मजबूत करण्यासाठी शरद पवार अॅक्टीव्ह झाले असून ते साखर पट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात वावरत आहेत.

दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पक्षात आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाच प्रवेश होण्याची शक्यता आहे. याबाबत हर्षवर्धन पाटील शुक्रवारी (ता.४) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण याच्याआधीच त्यांनी आणि कन्या अंकिता पाटील यांनी गुरूवारी (ता.३) सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. तर चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या अंकीता पाटील यांच्या व्हाट्सअपवरील तुतारी स्टेटसमुळेही राजकीय चर्चांना उधान आले आहे. हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाल्यास भाजपचा सहकारावरील मुख्यत्व साखर कारखान्यांवर असणारा ताबा कमी होणार आहे. या प्रवेशासोबतच सहकारातील अनेक बडे नेते देखील मविआकडे येतील. अशा प्रवेशांमुळे मात्र भाजपला खिंडार पडण्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुडाक्यात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील साखर पट्ट्यात दौरे सुरू केले आहेत. जेष्ठ नेते शदर पवार आणि राहूल गांधी भाजपला रोखण्यासह साखर पट्ट्यात मविआला मजबूत करण्यासाठी रनणीती आखत आहेत. राहूल गांधी माजी मंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. ते शुक्रवारी (ता.४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत आहेत. तर शनिवारी (ता.५) ते संविधान परिषदेला संबोधित करणार आहेत. यामुळे काँग्रेससह मविआच्या नेत्यांना कार्यक्रत्यांना नवी ऊर्जा मिळेल. राहुल गांधी महिन्याभरात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. याआधी ते सांगलीत स्वर्गीय डॉ. पंतगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते.

साखर पट्ट्यात कोण किती जागा जिंकले?

पुणे, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली अशा साखर पट्ट्यात तब्बल ७० मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ३९ जागांवर बाजी मारली होती. यात काँग्रेस-२७ आणि राष्ट्रवादीने १२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या वाट्याला २० जागा आल्या होत्या. तसेच शिवसेना ५ आणि ६ जागी अपक्ष निवडणूक आले होते. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीमुळे येथील शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना यांच्या मतदारांत विभागणी झाली होती. यामुळे पवार यांच्यासह ठाकरे यांचे प्राबल्य संपल्याची चर्चा लोकसभेच्या आधी रंगली होती. मात्र लोकसभेवेळी साखर पट्ट्यातील कोल्हापूर, सोलापूर, माढा, शिर्डी, नगर, शिरूर आणि सांगलीत मविआने मुसंडी मारत येथे आपले वजन असल्याचे दाखवून दिले होते. तर महायुतीला कोल्हापूर, पुणे आणि साताऱ्यातील एक खासदारकीची जागा राखता आली होती.

साखर पट्ट्यातील ७ जागी मविआचे खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने येथे शरद पवार यांची जादू अद्याप संपलेली नसल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील पावसाच्या सभेने राजकारण बदलेले होते. यानंतर आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेत उठवण्यासाठीच शरद पवार सतत पश्चिम मराष्ट्रात लक्ष घालत आहेत. जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी आणि नव्या नेतृत्वाला सोबत घेऊन शरद पवार पुढची वाटचाल करत आहेत. याचाच भाग म्हणून सांगतीतून रोहीत पवार, बारामतीत युगेंद्र पवार, कोल्हापूर कागलमध्ये समरजित घाटगे अशांना उमेदवारी देणार आहेत. इतर ठिकाणीही त्यांनी नवे चेहरे हेरले असून काही ठिकाणी उमेदवारीवरून मतभेद आहेत. मात्र तेही संपवून शरद पवार साखर पट्ट्यात आपली ताकद वाढवत आहेत.

पण अशा वेळी याच सहकार पट्ट्यात त्यांना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित अडचणीची ठरू शकते. शेतकरी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य अधिक असल्याने याचा फायदाही थेट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पण एकंदर असे चित्र साखर पट्ट्यात असतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह मविआ विधानसभेच्या ७० मतदारसंघापैकी किती मतदार संघात मुसंडी मारते का? सहकार क्षेत्र शरद पवार यांच्या मागे उभारते का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष