करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकीत ऊस बिले, वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी दिवाळीपूर्वी अदा न केल्यास २८ ऑक्टोंबर रोजी भीक मागो आंदोलन करणार -प्रा.रामदास झोळ सर

By : Polticalface Team ,10-10-2024

करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकीत ऊस बिले, वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी दिवाळीपूर्वी अदा न केल्यास २८ ऑक्टोंबर रोजी भीक मागो आंदोलन करणार -प्रा.रामदास झोळ सर

 करमाळा प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकीत ऊस बिले, वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी दिवाळीपूर्वी अदा न केल्यास २८ ऑक्टोंबर रोजी भीक मागो आंदोलन करणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला  ‌तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी कामगार ‌संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रा. राजेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील ,भीमराव ननवरे, बापू गायकवाड, संजय जगताप सर उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सह. साखर कारखाना, श्री मकाई सह. साखर कारखाना, श्री. भैरवनाथ शुगर लि. विहाळ, श्री. गोविंदपर्व गुळ कारखाना राजूरी, श्री. कमलाई शुगर अशा पाचही कारखान्यांनी ऊस उत्पादकांची बिले अद्याप दिलेली नाहीत.

याबाबत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये बिले न मिळाल्यामुळे असंतोष पसरला आहे. सध्या सणा-सुदीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे कारखान्यांनी दिवाळीपूर्व जर बिले अदा केली नाही, तर शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांचा अंत न पाहता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक बिले, तोडणी बिले, कामगारांच्या पगारी इत्यादी देणी कारखान्यांनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा तालुक्यातील सर्व पिडीत शेतकरी व विविध पक्ष, संघटना सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी  तहसिल कार्यालय करमाळा व कारखानदारांच्या घरी जाऊन भीक मागो आंदोलन करणार  असल्याचे ‌ शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी सांगितले आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी