भावंडं एकत्र असतात तोपर्यंत घराला धक्का नसतो, अजितदादांचे वक्तव्य चर्चेत, रोहित पवारांचेही कौतुक केले
By : Polticalface Team ,11-10-2024
जनआधार न्युज
भिमसेन जाधव
बारामती: उपमुख्यमंञी अजित पवार यांनी मंगळवारी बारामतीत झालेल्या डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यामध्ये एक किस्सा सांगितला. जोपर्यंत भावंड एकत्र असतात तोपर्यंत घराला कसलाही धक्का नसतो. परंतु घरात नवीन व्यक्ती आली की बदल होतात, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे बारामतीमधील दौरे वाढले आहेत. विविध समाज घटकांना भेटून गेल्या पाच वर्षांतील बारामतीमध्ये केलेली विकासकामे अजित पवार त्यांच्यापुढे ठेवत आहेत. जर अशीच दर्जेदार कामे बारामतीत यापुढेही व्हावीत, असे वाटत असेल न चुकता घड्याळाला मतदान करा, अशी आग्रहपूर्वक विनंती अजित पवार मतदारांना करत आहेत.
वाचक क्रमांक :