By : Polticalface Team ,16-10-2024
                           
              जनआधार न्युज भिमसेन जाधव सोलापुर: सध्या उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी आता मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्या पाण्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल, पण १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे
उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. याशिवाय दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. आता केवळ कॅनॉलमधीलच पाणी सुरू असून, तेही आता १५ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात आले असून, समाधानकारक पाऊस झाल्याने ते पाणी नदीच्या दिशेनेच वाहून गेले.
आता पावसाळा संपल्याने धरणातून सोडले जाणारे सर्व पाणी बंद केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांचे पाण्याचे नियोजन आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिल्या आवर्तनाचा निर्णय होईल. मार्च-एप्रिलमध्ये दुसरे तर आवश्यकतेनुसार मे महिन्यात शेवटचे आवर्तन सोडले जाऊ शकते. त्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांतच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष