उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

By : Polticalface Team ,16-10-2024

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

जनआधार न्युज भिमसेन जाधव  सोलापुर: सध्या उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी आता मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्या पाण्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल, पण १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे

उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. याशिवाय दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. आता केवळ कॅनॉलमधीलच पाणी सुरू असून, तेही आता १५ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात आले असून, समाधानकारक पाऊस झाल्याने ते पाणी नदीच्या दिशेनेच वाहून गेले.

आता पावसाळा संपल्याने धरणातून सोडले जाणारे सर्व पाणी बंद केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांचे पाण्याचे नियोजन आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिल्या आवर्तनाचा निर्णय होईल. मार्च-एप्रिलमध्ये दुसरे तर आवश्यकतेनुसार मे महिन्यात शेवटचे आवर्तन सोडले जाऊ शकते. त्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांतच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी